• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

साखर कारखान्यांना नोटीस बजावणार; जिल्हाधिकारी आक्रमक

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 12, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.१२: शेतकरी संघटनांसमवेत एफआरपीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक किंवा निर्णयक्षम वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून काल (शुक्रवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संताप व्यक्‍त केला. हा संताप व्यक्‍त करतानाच त्यांनी साखर कारखान्यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे उपस्थित शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले. 

जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. यानुसार आज शेतकरी संघटना प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्‍त बैठक आयोजिली होती. बैठकीच्या सुरुवातीस उपस्थित संघटना प्रतिनिधींनी कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला, तरी एकानेही एफआरपी जाहीर केली नसल्याचे सांगत बैठकांना कारखान्यांचे निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित कारखाना प्रतिनिधींना नाव आणि पद सांगण्यास सांगितले. यानंतर अनेकांनी नावे आणि पदे सांगितली. सचिव, शेतकी अधिकारी व त्यासमकक्ष अधिकारी बैठकीस आल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.

संघटना प्रतिनिधींनी यापूर्वी प्रत्येक बैठकीस कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहात असत. मात्र, अलीकडे कुणाला तरी पाठवून द्यायचे धोरण कारखान्यांनी अवलंबले आहे. या धोरणामुळे बैठकीत नुसती चर्चा होते आणि निर्णय कोणताही होत नाही. अनेक केसेस दाखल असल्याने शेतकरी संघटना सध्या थंड आहेत. याचा फायदा घेत साखर कारखान्यांनी मनमानी सुरू केल्याचे सांगत संताप व्यक्‍त केला. काहींनी थकीत एफआरपी व्याजासह देण्याची, एफआरपी जाहीर न करणाऱ्यांवर कारवाईची, एफआरपी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली. बैठकीची सूत्रे ताब्यात घेत जिल्हाधिकारी सिंह यांनी साखर आयुक्‍त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मांडलेली मते नोंदवून घेत त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. या वेळी त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांच्या अनुषंगाने दाखल असणाऱ्या तक्रारींची सुनावणी सुरू असल्याचे सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या बैठकीस निर्णयक्षम अधिकारी पाठवून न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या पहिल्या सत्रात बहुतांश शेतकरी प्रतिनिधींनी किसन वीर कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढत दोषींवर कारवाईची मागणी केली.


Tags: सातारा
Previous Post

पंधरा दिवसांत नेर कालव्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडणार; सेनेचा ‘पाटबंधारे’ला इशारा

Next Post

मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज

Next Post

मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

मार्च 20, 2023

‘रयत’ मार्फत मंगळवारी सौ.लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथीचे आयोजन

मार्च 20, 2023

तालुक्यातील 8 विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा; विडणीतील विजयानंतर जल्लोष

मार्च 20, 2023

शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन समारंभ

मार्च 20, 2023

विठ्ठलवाडी येथे महिला दिन व ‘घर दोघांचे’ जनजागृती अभियान संपन्न

मार्च 20, 2023

गुढीपाड्व्यादिवशी कुटुंबियांसोबत; आपल्यासाठी ८ एप्रिल : श्रीमंत रामराजे; भेटण्याचा प्रयत्न करू नये

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!