स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 26, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २६ : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चातील गोंधळ अद्याप सुरूच आहे. शेतकरी बॅरिकेड्स तोडून लाल किल्ल्यावर दाखल झाले आणि खलिस्थान पंथाचा झेंडा फडकवला. शेतकऱ्यांचा एक जत्था इंडिया गेटच्या दिशेने जात आहे. दुसरीकडे ITO जवळ पोलिसांसोबतच्या झडपेत वेगात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटल्याने मृत्यू झाला आहे. नवनीत सिंग असे या मृताचे नाव होते. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

लाठीचार्ज, दगडफेकीत अनेक शेतकरी व पोलिस जखमी झाले

ITO पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असता शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या झडपमध्ये अनेक शेतकरी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वेगाने चालवले असता पोलिसांना मागे हटावे लागले. पोलिसांनी तेथून पळ काढत जवळच्या इमारतींमध्ये गेले आणि तेथून शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केला.

निहंग्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला – पोलिसांचा दावा

याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱ्यांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱ्यांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रॅक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेला मार्ग शेतकर्‍यांनी तोडला

पोलिस शेतकऱ्यांना म्हणाले होते की, प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर 12 वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढवा. मात्र शेतकऱ्यांना परेड संपण्याआधीच मोर्चा काढला. बॅरिकेड तोडून शेतकरी पुढे सरसावले आणि आता ते पोलिसांनी दिलेल्या मार्गावर देखील जात नाहीत. पोलिस देखील मागे हटली आहे.

मोर्चात एक लाख ट्रॅक्टर असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

पोलिसांनी शेतकऱ्यांना केवळ 5 हजार ट्रॅक्टरसोबत रॅली काढण्याची मंजुरी दिली आहे. मात्र एकट्या सिंघू बॉर्डवर 20 हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर दाखल झाले. याआधी सिंघू, टीकरी आणि गाझीपूरवर सुमारे 1 लाख ट्रॅक्टर जमा होणार असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

Next Post

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

Next Post

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

ताज्या बातम्या

पसरणी घाटात दोन कारची धडक, पर्यटनाला आलेले पती-पत्नी व लहान मुलगी जखमी

March 8, 2021

कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

March 8, 2021

लोणंदच्या भारत गिअर्सचे कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण

March 8, 2021

कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल पालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई

March 8, 2021

रात्री उशिरा सुरू असणार्‍या दोन हॉटेलचालकांवर गुन्हा 

March 8, 2021

राज्यात भाजपचे सरकार येईल येईल ना. रामदास आठवले : नाराज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल

March 8, 2021

तालुक्यातील मातंग समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

March 8, 2021

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.