स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीज वितरणाच्या हलगर्जीपणाने शेतकर्‍याचा मृत्यू

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
वीज वितरणाच्या हलगर्जीपणाने शेतकर्‍याचा मृत्यू
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


 

स्थैर्य, मेढा, दि. 21 : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे  येथील शेतकरी नारायण किसन पार्टे यांचा शुक्रवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या शेतकर्‍याचा मृत्यू वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाला असून मृत शेतकर्‍याच्या वारसांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वीज वितरण कंपनीच्या वायरमनच्या चुकीमुळे या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत पंचनामा करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन, चर्चा करून मृत शेतकर्‍याच्या वारसांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सूचना केली. या दुर्घटनेला वायरमन जबाबदार असून त्याला तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थानी केली. यावर दोषी वायरमनवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन शाखा अभियंता राहुल कवठे व दत्तात्रय जरे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील शेतकरी नारायण किसन पार्टे हे पट्टीचा तळ या शिवारात गुरांना वैरण आणण्यासाठी सकाळी 7 च्या सुमारास गेले होते. ते लवकर घरी आले नाहीत म्हणून त्यांना पाहण्यासाठी त्यांची पत्नी शेतात गेली असता त्यांना त्यांचे पती नारायण पार्टे हे विजेची तार हातात असलेल्या अवस्थेत आढळून आले. शेतातील तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन, विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी गावाला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी तातडीने बंद केली. तत्काळ याची माहिती ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, सरपंच रवींद्र सल्लक, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र 4-5 तास उलटून गेले तरी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेहाचा पंचनामा करू देणार नाही, अशी भूमिका घेतली.

तहसीलदार पाटील यांनी तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केली. यावर शाखा अभियंता राहुल कवठे यांनी दोषी वायरमनला निलंबित करणार असून मृत शेतकर्‍याच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिल्यावर संतप्त ग्रामस्थ शांत झाले. मृत शेतकरी नारायण पार्टे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे आजची दुर्घटना घडली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केळघरसह परिसरात विजेचे खांब सडलेले आहेत. ठिकठिकाणी विजेच्या मुख्य लाइनला झाडाच्या फांद्या चिकटलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. वारंवार याबाबत तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी कोणतीच दखल घेत नसून संबंधित कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात, असा आरोपही ग्रामस्थ करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अजून किती निरपराध नागरिकांचा बळी जाणार आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

बारामतीतील गोविंदबागेत कोरोनाचा शिरकाव : चार कर्मचार्‍यांना

Next Post

दिल्लीत आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक

Next Post
दिल्लीत आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक

दिल्लीत आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.