स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात रंगणार चुरस; दुरंगी लढत होण्याची शक्यता

Team Sthairya by Team Sthairya
July 28, 2022
in फलटण, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. 28 जुलै 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत करण्यात आली. त्यामध्ये फलटण तालुक्यातील सर्व गट हे सर्वसाधारण खुले झाले असून कोळकी व वाठार निंबाळकर या दोन गटांसाठी ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षण निश्‍चित झाले आहे. फलटण तालुक्यातून एकूण 9 सदस्य सातारा जिल्हा परिषदेवर निवडून जाणार आहेत. त्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिग्गज नेत्यांपैकी कोणाला संधी मिळणार तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुसंडी मारणार का ? याबाबतची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणूकीत फलटण तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे असे दिग्गज नेते निवडणूकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यासोबतच राष्ट्रवादीकडून युवा नेतृत्व म्हणून श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर किंवा श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरु करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, तुकाराम शिंदे, अमित रणवरे, संदीप शिंदे, संतोष गावडे – पाटील, रणजीत शिंदे, नानासो उर्फ पिंटू इवरे, माउली सावंत हे दिग्गज नेते निवडणूकीच्या आखाड्यात दिसतील, अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

यासोबतच तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील व युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील यांची नक्की भूमिका काय असणार ? ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरणार कि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गत निवडणुकीच्या वेळी युवा नेते दिगंबर आगवणे हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात बरोबरीने कार्यरत होते. त्यांनतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व दिगंबर आगवणे यांच्या मधील पूर्वीचे सख्य आता राहिले नाही. त्यामुळे फलटण तालुक्यातील राजकारणात आता दिगंबर आगवणे यांची नक्की भूमिका काय असणार? हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. दिगंबर आगवणे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीला स्वतंत्र पॅनेल टाकून निवडणूक लढवणार का ? याची चर्चा सुद्धा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

युवा नेते सह्याद्री कदम हे सध्या तालुक्याच्या राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री कदम यांना माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचा मोठा वारसा आहे. स्व. चिमणराव कदम यांच्या विचाराचा गट आजही फलटण तालुक्यात सक्रीय राजकरणात आहे. जरी स्व. चिमणराव कदम यांच्या गटातील नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश करून राजकीय वाटचाल सुरु ठेवली असली तरीसुद्धा आजही गटातील कार्यकर्ते हे स्व. चिमणराव कदम यांच्या विचारानेच कार्यरत आहेत. पूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून सह्याद्री कदम हे पुन्हा तालुक्याच्या राजकारणात सक्रीय राहणार का ? सत्ताधार्यांशी बस्तान बांधून आपले राजकीय पाऊल सत्तेत ठेवणार कि पहिले पाढेच पुन्हा गिरवले जाणार ? याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

या सर्व घडामोडींचा विचार करता जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे सर्व गट हे खुले झाल्याने सगळ्या गटांमध्ये सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उमेदवार उतरवणार व जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी वाटचाल करणार हे मात्र नक्की आहे. त्याचबरोबर सदर लढत नेहमीप्रमाणे राजे गट विरुद्ध खासदार गट यांच्यात होणार कि अन्य तिसर्या आघाडीचा पर्याय जनतेसमोर असणार याकडेही तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Related


Previous Post

जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यातील सर्व गट खुले; महिलांसाठी दोन गट राखीव

Next Post

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे नाव आता सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार

Next Post

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे नाव आता सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी

August 19, 2022

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 19, 2022

अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 19, 2022

गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

August 19, 2022

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 19, 2022

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

August 19, 2022

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

August 19, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन

August 19, 2022

प्रवचने – आपल्याला देवाची नड वाटते का ?

August 19, 2022

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

August 19, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!