• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कृषी कायद्याच्या विरोधात सातार्‍यात एल्गारझोपडपट्टी सुरक्षा दलाचा शेतकर्‍यांना पाठींबा

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 22, 2020
in Uncategorized


स्थैर्य, सातारा, दि.२३: कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे दिल्ली राजधानीच्या सीमेवर गेली 26 दिवस आंदोलन होत आहे. कडाक्याच्या थंडीतही श्रमजीवी शेतकरी पोशिंदा आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांवर ठाम असणार्‍या शेतकर्‍यांचा लढा सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत मृत्युमुखी झालेल्या शेतकर्‍यांना शहीद व्हावे लागले ही बाब मानवतेच्या दृष्टीने काळीमा फासणारी व निंदनीय आहे. ऐतिहासिक सातारा याठिकाणी  शेतकर्‍याच्या बद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आसूड निदर्शने आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी वैराट म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी उग्र आंदोलन उभे राहावे. जेणेकरून शेतकर्‍यावर जुलमी दंडात्मक कारवाई होत आहे आणि भांडवलशाहीच्या हिताचा कायदा असल्यामुळे पोशिंदा वर अन्याय होत आहे. त्याविरोधात आम्ही शेतकरी अवजारे आणि शेतकर्‍यांच्या वेशभूषेत आंदोलन उभारून इशारा देत आहोत. तात्काळ शेतीविषयक केलेले कायदे रद्द करून शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे करावे, ही मागणी महाराष्ट्रातील गोरगरीब झोपडपट्टीवासीय मागणी करीत आहे.

तसेच कोरोनाच्या महामारीमुळे देशावरील आलेली मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना सेवेत घेऊन सक्तीने कपात केल्यामुळे कुटुंबाची हलाखीचे दिवस आणि उपासमार झालेली असल्यामुळे आता हळूहळू कोरोना हद्दपार होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गमावलेल्या नोकरांना पूर्वीच्या अस्थापनावर सेवेत घेऊन पूर्ववत कायम करावे अशीदेखील मागणी वैराट यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, बिलोली येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना शक्ती कायद्यानुसार फाशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. 

आंदोलनात विशेषता काबाड कष्ट करणारे शेतकरी मजूर अंग मेहनती कार्यकर्ते हे शेतकरी वेशभूषेत वेशभूषेत एकत्र जमून शेतकर्‍यांचे अवजार घेऊन पवई चौकात निदर्शने करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, अशोक खुडे, प्रवीण सपकाळ, सनी ननावरे, सचिन वायदंडे, सागर पवार, अशोक जाधव, ऋषिकेश वायदंडे, सुनिता जाधव, महंमद शेख, सुरेखा भालेराव, निवृत्ती वैराट इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. शेकडो कार्यकर्ते आंदोलनात निदर्शने करताना शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, गमावलेल्या नोकर्‍या परत द्या, नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावी अन्याय अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना नवा शक्ती कायदानुसार फाशी द्या अशा घोषणा दिल्या.


Tags: सातारा
Previous Post

पेटीएम पेमेंट्स बँकेकडे यूपीआय पेमेंटसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान : एनपीसीआय अहवाल

Next Post

सुजैन खानने अटकेच्या बातमीवर दिलं स्पष्टीकरण, पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती

Next Post

सुजैन खानने अटकेच्या बातमीवर दिलं स्पष्टीकरण, पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!