• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उपजीविकेसाठी कामगारांच्या पावलांना लाभला सायकलींचा आधार!

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 25, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२५ : लॉकडाउन काळात वाहनांअभावी कित्येकांना मोठी पायपीट करावी लागली. ये- जा करताना कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागले. अशांच्या मदतीसाठी पुण्यातील “परिवर्तन’ ही सामाजिक संस्था धावून आली आहे. या संस्थेतर्फे जिल्ह्यातील 30 जणांना मोफत वाटप करण्यात आले.

परिवर्तन ही पुण्यातील सामाजिक संस्था. गेले दहा वर्षे संस्थेने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. विशेषतः संस्थेच्या परिवर्तन सायकल अभियानातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ बनले आहे. आजवर संस्थेने एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या नव्या आणि जुन्या सायकलींचे वाटप केले आहे. “परिवर्तन सायकल बॅंक’या योजनेतून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ अन्‌ पैसे वाचावेत, या हेतूनेही सायकलींचे वाटप केले आहे.

संस्थेचे सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावी अन्‌ परिणामकारक काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेकडून कंपनी कामगार वा उपजीविकेसाठी पायी जाणाऱ्या 30 जणांना नवीन सायकलींची भेट देण्यात आली.

मनमोहक रुपात सिद्धनाथ-माता जोगेश्वरी; विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने भाविकांची इच्छा पुरी!

भारत स्काउट गाइड कार्यालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. आमदार महेश शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, सासवडच्या जगताप फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जगताप, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब देडगे, समन्वयक किशोर ढगे, भुजंगराव जाधव, सचिन जगताप, कविता चौगुले, विभा साबळे आदींची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे यांनी संस्थेच्या या आगळ्या सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक केले. संस्थेस आवश्‍यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागांतील 30 गरीब, होतकरू व्यक्तींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. अरुणा बर्गे यांचा कोरोनाजन्य काळात सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार सुनील शेडगे यांचाही संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान


Tags: सातारा
Previous Post

दुष्काळी माण तालुक्यात चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा

Next Post

विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान

Next Post

विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!