• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे १० डिसेंबरला भूमिपूजन

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 6, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.६: नव्या संसद
भवनाचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली.

बिर्ला म्हणाले, नव्या संसद भवनाची क्षमता
ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी
सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक
जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी
बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही
सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत.

नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर
भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल. जुन्या संसद
भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५००
स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपये
खर्च येणार असून टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट
देण्यात आले आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या
कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे, अशी माहितीही यावेळी बिर्ला यांनी
दिली.

ही नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असणार
आहे. यानुसार सध्याच्या राष्ट्रपती भवन ते थेट इंडिया गेटपर्यंतच्या ३
किलोमीटरच्या राजपथच्या दोन्ही बाजूला या इमारती उभारल्या जाणार आहे.
त्यासाठी संसद, सरकारी कार्यालये आणि निवासस्थानांच्या जुन्या इमारती
हटवल्या जाणार आहे.

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास
८५० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी कोरोनाच्या काळात हा
अनावश्यक खर्च केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे
बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. २०२२ पर्यंत हे काम
पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. २०२२ मध्येच भारताच्या
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा
उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे.

नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असेल.
त्यात भारताच्या लोकशाहीचा वारसा असलेल्या गोष्टींचे खुले प्रदर्शन असेल.
या शिवाय खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या,
खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
करण्यात येणार आहे.


Tags: देश
Previous Post

एप्रिल 2023 पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू, धनंजय मुंडेची घोषणा

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला अभिवादन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला अभिवादन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

मार्च 20, 2023

‘रयत’ मार्फत मंगळवारी सौ.लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथीचे आयोजन

मार्च 20, 2023

तालुक्यातील 8 विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा; विडणीतील विजयानंतर जल्लोष

मार्च 20, 2023

शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन समारंभ

मार्च 20, 2023

विठ्ठलवाडी येथे महिला दिन व ‘घर दोघांचे’ जनजागृती अभियान संपन्न

मार्च 20, 2023

गुढीपाड्व्यादिवशी कुटुंबियांसोबत; आपल्यासाठी ८ एप्रिल : श्रीमंत रामराजे; भेटण्याचा प्रयत्न करू नये

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!