
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ३ : चीन आणि भारत यांच्यात सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने मोठी कारवाई करताना पबजीसह 118 अप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने 57 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट या अॅप्सचा समावेश होता. आता नवीन बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजी मोबाइल लाइट, वी चॅट वर्क अँड वीचॅट रिडिंग यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे.
