स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दबा धरून बसलेला वाघ?

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
दबा धरून बसलेला वाघ?
ADVERTISEMENT


 

गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच नाही, म्हणून त्याला अज्ञातवास म्हणावे लागते. त्याचे नाव आहे, राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज्यव्यापी पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष असून राजकीय घडामोडी घडत असताना त्यांनी गप्प बसावे, हा त्यांचा स्वभाव नाही. अशा प्रत्येक बाबतीत आपले खास मतप्रदर्शन करण्यासाठी ते ख्यातनाम आहेत. पण कोरोनापासून सुशांत सिंग राजपूतच्या शंकास्पद मृत्यूपर्यंत एकाहून एक खळबळजनक घटनाक्रमाची रांग लागलेली असताना, राज ठाकरे गप्प आहेत. ही बाब म्हणूनच खटकणारी आहे. अर्थात राज हे मुळचे शिवसेना नेता असून बाळसाहेबांचे पुतणेही आहेत. त्यांची जडणघडण शिवसेनेतली असून वेगळा पक्ष काढला तरी त्यांचा आवेश व अभिनिवेश नेहमीच मुळच्या शिवसेनेसारखा राहिलेला आहे. त्यामुळेच आरंभी सतत अपयश आल्यानंतरही बाळासाहेबांनी आपली वक्तव्ये वा झुंजार शिवसैनिकांच्या बळावर जनमानसात आपली छाप पाडलेली होती. त्यांची चाळीस वर्षानंतरची प्रतिकृती असल्यासारखेच राज ठाकरे मागल्या १५ वर्षात वागलेले आहेत. म्हणूनच त्यांचे आजचे मौन चकीत करणारे आहे. किंबहूना राज ठाकरेच एकटे गप्प नाहीत त्यांच्या सोबतच शिवसेनेत काम केलेले कधीकाळचे अनेक दिग्गज नेते व विविध ज्येष्ठ शिवसैनिकही हल्लीच्या घटनांपासून चार हात दुर असलेले दिसतात. थेट ठाकरे कुटुंबावर आरोप होत आहेत आणि राजकीय खडाजंगी माजलेली आहे. पण त्यातही कुठे ज्येष्ठ शिवसेना नेते वा शिवसैनिकांचा सहभाग दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे मौन म्हणूनच जास्त ठळकपणे नजरेत भरणारे आहे.

ज्यांनी मागली पन्नास वर्षे वा किमान मागल्या दोनतीन दशकातली शिवसेना बघितलेली व अनुभवलेली आहे, त्यांना अशा घटनाक्रमात शिवसेनेकडून उमटणारी प्रतिक्रीया वा दिला जाणारा प्रतिसाद चांगलाच परिचित आहे. तो इतका नगण्य नक्कीच नव्हता व नसतो. कोरोनाच्या बाबतीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना झालेला भोंगळ कारभार, किंवा लोक इतके संकटात असताना रस्त्यावर कुठेही शिवसैनिकांची धावाधाव नसणे. शिवसेना व ठाकरे परिवारावर थेट तोफ़ा डागल्या जात असताना किती काहुर माजले असते? कधीकाळी अशी कडवी बोचरी टिका झाल्यावर शिवसैनिकांचे हल्ले झाल्याच्या बातम्या वाचायला ऐकायला मिळायच्या. पण त्याचा मागमूस गेल्या काही महिन्यात कुठे दिसलेला नाही. उलट आजकाल शिवसैनिक बाजूला पडलेले असून, काही प्रमाणात कॉग्रेस व आक्रमकपणे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचा बचाव मांडताना दिसतात. ही बाब चमत्कारीक नाही काय? फ़डणविस यांच्या सरकारमध्ये सामील असतानाही शिवसेना व शिवसैनिक जितका आक्रमक दिसलेला होता, त्याचाही कुठे मागमूस आज नाही. जणू सरकारमध्ये जाताना किंवा मुख्यमंत्रीपद मिळवताना शिवसेनेने आपले अस्तित्व विसर्जित करून घेतले असावे, असेच वाटते. कारण शिवसेना म्हणजे आमदार, नगरसेवक वा सत्तापदी बसलेले कोणी नसायचे. शिवसेना म्हणजे उसळत्या रक्ताचे उत्साही तरूण, हीच तिची ओळख होती. काही वर्षापुर्वी खुद्द शरद पवारांनीही आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्याचा दाखला दिला होता. सत्ता कोणाचीही असली तरी शिवसैनिक पोलिस ठाण्यात गेला तर अधिकारी वचकून असतात, त्याची दखल तात्काळ घेतली जाते, म्हणून संघटना तशी असायला हवी, असे थोरले पवार म्हणाले होते. तिचा मागमूस आज कोणाला दिसतो काय?

आता शिवसेना वा तिची संघटना म्हणजे फ़क्त एक मुखपत्र होऊन गेलेले आहे. ‘सामना’ दैनिकात कुठला लेख वा अग्रलेख आला, त्याला शिवसेनेचा आवाज म्हटले जाते. बातम्या सामनापुरत्या मर्यादित होऊन गेल्या आहेत. पण अन्य काही शिवसेना काम करते किंवा उपदव्याप करते; असेही कुठे कानी येत नाही. याचा अर्थ अमदार, खासदार व नगरसेक्वकांचा पक्ष सोडून शिवसेनेचा अस्त झाला आहे काय? ती विसर्जित झाली आहे काय? लाखो हजारोच्या संख्येने तो युयुत्सू मराठी तरूण कुठे गायब झाला आहे? हातात कुठले शिवबंधन बांधलेले नसतानाही शिवसेना या चार शब्दांसाठी आपली शक्ती पणाला लावून पुढे सरसावणारा वा कुठलाही धोका पत्करणारा शिवसैनिक; मागल्या आठ महिन्यात कुठे दिसला आहे का? नसेल तर तो संपला असे होत नाही. कारण तो तरूण, त्याचा उत्साह वा उत्सुकता गायब होऊ शकत नाही. ती काही काळ सुप्तावस्थेत जाऊ शकते. पुन्हा एकदा तिच्या प्रेरणा जाग्या केल्यास, त्यांना चालना मिळू शकते. अर्ध्या शतकापुर्वी तेव्हाचा मराठी तरूण असाच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागे धावत होता. पण महाराष्ट्राची स्थापना झाली आणि समितीतल्या विविध पक्ष व नेत्यांनी त्या तरूणाच्या आकांक्षांना हरताळ फ़ासून त्याचा भ्रमनिरास करून टाकला. समिती मोडली, तेव्हाही मराठी अस्मितेने पेटलेला तरूण असाच सुप्तावस्थेत गेलेला होता. राज्य मिळाले, मग समितीची गरज उरली नाही. म्हणून त्या तरूणाला नेत्यांनी वार्‍यावर सोडून दिले आणि त्याला नेतृत्व नसल्याने तोही सुप्तावस्थेत गेलेला होता. त्याला प्रेरणा व नवी चालना देण्याचा पवित्रा ‘मार्मिक’ साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि त्या तरूणाने त्याच व्यंगचित्रकार संपादकाला आपला नेता करून टाकले होते. त्या चमत्काराला शिवसेना म्हणून नंतरच्या काळात जगाने ओळखले गेले. आजची शिवसेना तशी उरली आहे काय?

अर्थात शिवसेना स्थापन होऊन गुरगुरू लागली तरी तिला राजकारणात आपला ठसा उमटवायला दोन दशकांचा कालावधी लागला होता. जेव्हा आणिबाणी व जनता लाट आली, त्यात शिवसेनाही मरगळली होती. तेव्हाची मरगळ असताना बाळासाहेबांनीही अज्ञातवास किंवा शांत रहाण्याला प्राधान्य दिलेले होते आणि आपलीच क्षीण झालेली शक्ती पणाला लावलेली नव्हती. तो बदलत्या राजकारणाचा भर ओसरल्यावर राजकारणात नव्याने पोकळी निर्माण होण्याची प्रतिक्षा केलेली होती. जनता लाट संपली आणि इंदिरा हत्येनंतर तोही राजकारणाचा भर ओसरला; तेव्हा तशी पोकळी निर्माण होताच त्यांनी नव्या दमाने राजकारणात उडी घेतली. तेव्हा आजच्या सेनेचे अनेक नेते फ़ार तर शाखाप्रमुख वा विभागप्रमुख म्हणूनच आपापल्या विभागात ओळखले जात होते. नारायण राणे, दिवाकर रावते, रामदास कदम अशी खुप नावे सांगता येतील. पण १९८५-८६ च्या राजकीय पोकळीत शिरले आणि बाळासाहेबांनी बघता बघता महाराष्ट्राला गवसणी घातली होती. मात्र मधली चारपाच वर्ष अत्यंत प्रतिकुल हवा असताना त्यांनी आपल्या मुंबई ठाण्यातल्या संघटनेला जपण्याचा व जगवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यातूनच नव्या दमाने शिवसेना पुन्हा उभी राहिली. हा इतिहास एवढ्यासाठी सांगायचा, की मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ताजे मौन किंवा अज्ञातवास त्याच कालखंडाची आठवण करून देतो आहे. मुंबईत महापालिका जिंकल्यावर नेमके शरद पवारांनी महाराष्ट्रात तशी पोकळीच निर्माण करून दिलेली होती. पुलोद मोडून पवारांनी १९८६ सालात पुन्हा कॉग्रेस पक्षात जाण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी जे कॉग्रेस विरोधातील नव्या तरूणाला नेतॄत्व दिलेले होते, त्यालाच वार्‍यावर सोडून दिलेले होते. तो तरूण पवारांसमवेत कॉग्रेसमध्ये गेला नाही, तर नव्या नेतृत्वाच्या शोधात होता आणि बाळासाहेबांनी ‘आता धोडदौड महाराष्ट्रात’ अशी घोषणा केली.

राजकीय क्षेत्रात जेव्हा नेतृत्वाची पोकळी निर्माण होते, तेव्हा सक्षम नेतृत्वाला उभारी घेण्याला पोषक वातावरण आपोआप निर्माण होत असते. मोदी युगात मनसे मागे पडली होती आणि मध्यंतरी पवारांच्या आहारी गेल्यामुळे राज ठाकरे अलगठलग पडून गेले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बरेच सावरलेले आहे. निदान चुकीच्या वेळी आगंतुक पवित्रा घेऊ नये, इतका संयम त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दाखवला आहे. एक एक पाऊल जपून टाकताना ते दिसलेले आहेत. म्हणूनच त्यांचे आजचे मौन विचार करायला लावणारे आहे. तीन पक्षांचे सरकार बनवताना वा दोन्ही कॉग्रेस सोबत सत्तेसाठी जाताना शिवसेनेने ठराविक मतदाराच्या सदिच्छांना लाथ मारलेली आहेच. परंतु मुख्यमंत्रीपद मिळवताना केलेल्या तडजोडींनी अनेक स्वपक्षीयांनाही नाराज केलेले आहे. राष्ट्रवादी वा कॉग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये जशी सत्ता झिरपलेली आहे, तशी ती शिवसेनेच्या तळागाळापर्यंत झिरपू शकली नसल्यामुळे नाराजी आहेच. पण कोरोनाचे आव्हान पेलताना संघटनेचा पुरता अभाव समोर आला आहे. पण त्यांच्या तुलनेत मनसेची शक्ती कमी असली तरी आपापल्या विभागात मनसेचे तरूण खुप धावपळ करताना लोकांना आढळत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे अनेक जुनेजाणतेही आपापल्या घरात निष्क्रीय बसलेले आहेत. अशा प्रसंगात लोकांची मने जिंकणारा पराक्रम करण्याची क्षमता व इच्छा असलेल्या त्या शिवसैनिकाला नेतृत्व वा चालना देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असा तरूण किंवा जुना उत्साही शिवसैनिक नेतृत्वासाठी आशाळभूत असतो आणि तो पुन्हा नेत्याचा शोध घेत असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तो भाजपा किंवा अन्य पक्षात जाऊ शकत नाही, तर शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेशी जुळणार्‍या दिशेने वळू शकतो.

सामना वा शिवसेनेचे विविध प्रवक्ते कितीही बोलले, तरी आज ती जुनी शिवसेना सुप्तावस्थेत गेलेली आहे, याची खात्री बाळगावी. त्या सुप्तावस्थेतून तिला बाहेर काढण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यापाशी नाही. किंबहूना त्यांना शिवसेना म्हणजे आमदार वा निवडून आलेली मंडळी वाटतात. बाकीचा खराखुरा चमत्कार घडवणारा शिवसैनिक त्यांनी वार्‍यावर सोडलेला आहे. राज ठाकरे त्यांनाच हाताशी धरून नव्याने आपली घडी बसवायला मुहूर्त शोधत आहेत काय? तसा मुहूर्त वा वेळ येण्याच्या प्रतिक्षेत हा वाघ दबा धरून बसलेला आहे काय? यावेळी कुठल्याही बाजूने टोकाचे बोलण्यापेक्षा मराठी अस्मितेला चुचकारत, त्याच उसळत्या रक्ताच्या तरूणाला आपल्या पंखाखाली घेण्याचे विचार मनसेच्या डोक्यात असावेत काय? जेव्हा उघडपणे या सुप्तावस्थेचा भडका उडायची वेळ येईल, तेव्हा झेप घेऊन पुढे येण्याची प्रतिक्षा चालू आहे काय? लोकपाल आंदोलन, विविध घोटाळ्यांचा प्रचंड गाजावाजा चालू असतानाही नरेंद्र मोदी त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिले होते. प्रस्थापित युपीए सरकार पुर्ण बदनाम झाल्यावर लोकक्षोभाचे राजकीय नेतृत्व देण्याची योग्य वेळ आल्यावरच मोदींनी राजकीय आखाड्यात उडी घेतली होती. तोपर्यंत माध्यमांचा सगळा अवकाश अण्णा हजारे वा रामदेव इत्यादिंनी व्यापला असतानाही मोदींनी त्यात पुढाकार घेतला नव्हता. लोकभावनेवर स्वार होण्यासाठी योग्य वेळ निवडावी लागते आणि स्पर्धक नसताना त्यात सहज यश मिळवता येत असते. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी शिवसैनिकांचा भ्रमनिरास होण्याची प्रतिक्षा राज ठाकरे करीत असतील, तर अयोग्य म्हणता येणार नाही. कारण शिवसैनिकांना वा त्यासारखे तरूण असतात, त्यांना खंबीर धाडसी ठाकरे पुढे हवा असतो आणि राज ठाकरे यांनी त्याची चुणूक खुप आधीच दाखवून झाली आहे. मग हा वाघ दबा धरून बसला आहे काय? अशी शंका घ्यायला जागा आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: संपादकीय
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्यावतीने ढवळ येथे दोन हजार वृक्षांचे मोफत वाटप

Next Post

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Next Post
वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

January 23, 2021
कृषी कायद्यांना 2 वर्षांसाठी थांबवण्यास केंद्र तयार; पण, कायदे परत घेण्यावर शेतकरी ठाम

आमच्या प्रस्तावांवर निर्णय घ्या, यापुढे बैठका होणार नाहीत; केंद्र सरकारची शेतकऱ्यांना स्पष्टोक्ती

January 23, 2021
15 लाखांसाठी विवाहितेचा जाचहाट

15 लाखांसाठी विवाहितेचा जाचहाट

January 23, 2021
सदर बझारमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा लहान मुलीवर हल्लासीसीटीव्ही कॅमेर्‍यात प्रकार कैद 

सदर बझारमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा लहान मुलीवर हल्लासीसीटीव्ही कॅमेर्‍यात प्रकार कैद 

January 23, 2021
डंपर ची दुचाकीला धडक महिला ठार

डंपर ची दुचाकीला धडक महिला ठार

January 23, 2021
आनेवाडी टोलनाका हस्तांतर आंदोलनप्रकरणी खा. उदयनराजे व अकरा समर्थक निर्दोष, वाई न्यायालयाचा निकाल

आनेवाडी टोलनाका हस्तांतर आंदोलनप्रकरणी खा. उदयनराजे व अकरा समर्थक निर्दोष, वाई न्यायालयाचा निकाल

January 23, 2021
PMC बँक घोटाळा : ED ची वीवा ग्रुपच्या 6 ठिकाणांवर छापेमारी

PMC बँक घोटाळा : ED ची वीवा ग्रुपच्या 6 ठिकाणांवर छापेमारी

January 22, 2021
‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास दिला’: अजित पवार

‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास दिला’: अजित पवार

January 22, 2021
मुख्यमंत्र्यांकडून सीरमची पाहणी

मुख्यमंत्र्यांकडून सीरमची पाहणी

January 22, 2021
अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता

शेअर बाजारातील तेजी ओसरली; सेन्सेक्सची ७४६ अंकांनी घसरण

January 22, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.