स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू शेट्टी

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
राज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू शेट्टी
ADVERTISEMENT


दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

स्थैर्य, सातारा : गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गाई व बैलगाडीसह आंदोलक आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच पोलिसांनी अडवले. यावेळी अधिकार्‍यांची आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, मागणी व पुरवठा सुत्रानुसार उत्पादन कमी होवूनही दुधाचे दर का पडले आहेत असा सवाल करत दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. 

सुरुवातीला पुणे-बेंगलोर महामार्गावर बाँम्बे रेस्टॉरंट येथे खा. राजू  शेट्टी यांचे आगमन झाल्यनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर आंदोलकांना त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, बाजारपेठेतील मागणीवर दर ठरत असतात. मागणी व पुरवठा या सुत्रानुसार दर कमी-जास्त होतात. गरजेपेक्षा पुरवठा वाढला तर दर पडतात आणि गरजेपेक्षा पुरवठा कमी झाला तर दर वाढतात. आज गेल्या चार-पाच वर्षातील माहिती घेतली तर सध्या दुधाचा दुष्काळ सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या मानाने यावर्षी दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. दोन वर्षापूर्वी झालेला दुष्काळ किंवा सातत्याने कमी होणारे दुधाचे भाव असतील, या कारणांमुळे शेतकर्‍यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. मग दुधाचे उत्पादन कमी झाले असतील दुधाचे पडायचे कारणच काय? लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी अनेक जाणकारांनी आपले अंदाज व्यक्त केले होते की यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये दर जास्त असणार. गाईच्या दुधाचा भाव 40 ते 41 पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, सध्या गाईच्या दुधाचा भाव 17 रुपयांपर्यंत खाली आला आहे.शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव देण्याची गरज असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

यानंतर जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 17 ते 20 रूपये दूध दर दिला जातो. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात 19 लाख लिटरने घट झालेली आहे. सन 2018 मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर 5 रूपयेचे अनुदान जाहीर करून 700 कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे. या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत. आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून शेतकर्यांच्या दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्यावतीने ढवळ येथे दोन हजार वृक्षांचे मोफत वाटप

Next Post

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Next Post
वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

January 20, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

सावधान! माण तालुक्यात 97 कोंबड्यांचा मृत्यू

January 20, 2021
सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

January 20, 2021
काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

January 20, 2021
काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

January 20, 2021
“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

January 19, 2021
आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

January 19, 2021
रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

January 19, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

43 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 19, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.