स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा-कोल्हापूरला तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवणार

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
सातारा-कोल्हापूरला तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवणार
ADVERTISEMENT


 

राजेश टोपे यांची माहिती : रिकव्हरी रेट वाढवणे व मृत्यूदर कमी करन्यावर भर

स्थैर्य, कराड, दि. 9 : राज्यातील करोनाचा रिकव्हरी रेट वाढवणे व मृत्यूदर कमी करन्यावर शासनाचा भर आहे. यासाठी जास्तीत जास्त निकट सहवासीतांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा रेथे उद्यापासून टेस्टींग लॅब सुरू केली जाणार असून येथील जिल्हा आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराबाबत लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्या आहेत. त्याअनुषंगे नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील करोना बाधितांचा रेट कमी करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

येथील करोनासंदर्भातील आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. राजू आवळे, आ. शशिकांत शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख उपस्थित होते.

ना. राजेश टोपे म्हणाले, सध्या करोना पॉझिटिव्ह रूग्णांचा वाढता रेट कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यासाठी निकट सहवासीतांच्या तपासावर अधिक भर दिला आहे. टेस्ट मोठ्या प्रमाणवर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्ट तसेच आरटीपीसीआरची टेस्ट वाढवल्या आहेत. आजपासून सातारा रेथे आरटीपीसीआरची नवीन लॅब सुरू करण्यात येत आहे. तिचे काम उद्यापासून सुरू होईल.  करोना बाधितांचा रिपोर्ट 24 तासाच्या आतच आला पाहिजे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. संख्या वाढणे हा काळजीचा विषय आहे मात्र, रिकव्हरी रेट वाढणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी लवकर निदान करण्यासाठी निकट सहवासीतांचा शोध घेणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यातील मृत्यूदर वाढू नये यासाठी राज्य शासनाकडून सर्वाधिक काळजी घेण्यात येत आहे. खासगी हॉस्पिटल नॉन कोव्हिड रूग्णांना करोनाची टेस्ट झालयशिवाय त्यांच्यावर उपचार करत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. असे रूग्ण तपासताना त्या रूग्णाची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी, या टेस्टचा रिपोर्ट तात्काळ मिळतो. मात्र, त्यांनी कोणत्याही रूग्णाला नाकारू नये. असे कोणतेही हॉस्पिटल करत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या हॉस्पिटलवर करवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ते म्हणाले, खासगी हॉस्पिटलसाठी 80 टक्के बेड कोव्हिड रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातीला रिक्त जागा तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील जागा भरण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ही भरती तात्काळ करण्यात येणार आहे. त्यासाठी मेरीट हाच निकष लावला जाणार असल्याचेही ना. राजेश टोपे यांनी सांगितले.

 

राज्यासाठी नवीन 500 रूग्णवाहिका

राज्यातील डोंगर दुर्गम भागात करोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता येथील रूग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी रूग्णवाहिकांची गरज असल्याचे दिसून आले आहे. शिवार तशी मागणी लोकप्रतिनिधींकडूनही होत आहे. याचा विचार करून तातडीने नवीन पाचशे रूग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सातारा येथील जिल्हा रूग्णालयातील अनागोंदी कारभाराविषयी काही प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. मग ते सर्जनचे असोत अथवा येथे काम करणाऱ्या डॉक्टरचे असोत. यासाठी जिल्हा रूग्णालयाचे मोठे ऑपरेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केल्या जाणार आहेत. तसेच येथे नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात  आला आहे.

करोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना खासगी हॉस्पिटलमधून लाखोरूपयांची बिले केली जात आहेत. याबाबत आलेल्या तक्रारी व केलेल्या पाहणीनंतर कोव्हिड रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराच्या बिलावर एका विशिष्ट पातळीवर मर्यादा  घालण्यात आली आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या  निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यापेक्षा कोणी जादा बिल आकारणी करत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी भरारी पथक नेमण्यात आली आहेत.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: कराड
ADVERTISEMENT
Previous Post

सिव्हिल सर्जन आमोद गडीकरांची उचलबांगडी

Next Post

फलटण मध्ये कोरोनाचा हाहाकार; २५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

Next Post
फलटण मध्ये कोरोनाचा हाहाकार; २५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

फलटण मध्ये कोरोनाचा हाहाकार; २५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

January 17, 2021
स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

January 17, 2021
”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

January 17, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

संशयितांचे 72 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 17, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

January 17, 2021
Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.