• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आंदोलनाचा 19वा दिवस : शेतकरी म्हणाले – रातोरात संघटना उभ्या, नावेही ऐकली नाहीत

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 15, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१५: नव्या कृषी कायद्यांच्या
विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारी अनेक राज्यांतील
शेतकऱ्यांनी उपोषण केले. दुसरीकडे, चर्चेची दारे खुली आहेत, पण कायदे मागे
घेणार नाही, असा स्पष्ट पुनरुच्चार केंद्र सरकारने केला. तिकडे, शेतकरीही
कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यूपी, बिहारसह इतर राज्यांतील १५
पेक्षा जास्त संघटनांनी कायद्यांचे समर्थन केले आहे, असा सरकारचा दावा आहे.
पण संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य शिवकुमार कक्का म्हणाले की, सरकार संभ्रम
निर्माण करत आहे, अनेक संघटना रात्रीतून उभ्या केल्या जात आहेत. अनेक
संघटनांची नावेही ऐकली नाहीत. सोमवारी जे लोक कृषिमंत्र्यांना भेटले, ते
अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे आहेत. दिल्ली आणि इतर राज्यांत संयुक्त
मोर्चाच्या बॅनरखाली आंदोलन सुरू असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, कायदे शेतकरी हिताचे आहेत, ते मागे
घेतले जाणार नाहीत. कृृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, खरे शेतकरी
नेते पुढे आले तरच तोडगा निघू शकेल.

शेतकऱ्यांना पाठिंबा देत मुलांनी सोपवला गल्ला

–
गाझीपूर बॉर्डरवर मीरतच्या चार मुलांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. ७ ते १३
वर्षांदरम्यान वय असलेल्या या मुलांनी गेल्या ४-५ महिन्यांत आपल्या
गल्ल्यामध्ये साठवलेले पैसे शेतकऱ्यांना दिले.

– एनएच-२४ वर काही आंदोलक
धरणे देत होते. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलकांना हायवे मोकळा
करण्याची विनंती केली. आंदोलकांनी ती मान्य केली.

– कुंडली बॉर्डरवर
निदर्शनांत पंजाबच्या मोगाचे शेतकरी मक्खन खान (४२) यांचा हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू झाला. गेल्या १९ दिवसांत आंदोलनस्थळी १५ हून जास्त लोकांचा
मृत्यू झाला आहे.

कॅनडाकडून राजकारण

आंदोलनावर
कॅनडाची भूमिका ही थेट व्होट बँकेचे राजकारण असल्याचा आरोप माजी भारतीय
मुत्सद्द्यांनी खुल्या पत्रात केला. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे
वक्तव्य अनावश्यक, अवास्तव आणि चिथावणीखोर असल्याचे मुत्सद्द्यांनी म्हटले
आहे.

जिअोचे पत्र : आंदोलनाकडून स्पर्धकांचा खोटा प्रचार

रिलायन्स
जिअोने ट्रायला पत्र लिहून व्होडा-आयडिया व एअरटेलची तक्रार केली आहे.
जिअोच्या आरोपानुसार, ‘शेतकरी आंदोलनाचा या कंपन्या गैरफायदा घेत आहेत.
स्पर्धक कंपन्या त्यांच्या कर्मचारी, एजंट व रिटेलर्सच्या माध्यमातून
रिलायन्सविरुद्ध नकारात्मक मोहीम राबवत आहेत. यामुळे आपल्या प्रतिमेला तडा
जात आहे. ग्राहकांना लालूच दाखवून जिओतून पोर्ट करण्यास भाग पाडले जात
आहे.’


Tags: देशशेती विषयक
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटणची परंपरागत रामरथ यात्रा यावर्षी रद्द

Next Post

आश्वासनाचा केंद्राला विसर; अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार

Next Post

आश्वासनाचा केंद्राला विसर; अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!