• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आश्वासनाचा केंद्राला विसर; अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 15, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.१५: शेती व शेतकरी हिताच्या
मागण्यांसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दोन वर्षांपूर्वी केलेले
उपोषण तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या लेखी
आश्वासनानंतर मागे घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
मंत्री गिरीश महाजनांंच्या मध्यस्थीने मागे घेतलेल्या या आंदोलनाची
आश्वासनपूर्ती झाली नसल्याने लवकरच पुन्हा उपोषण करण्याचा इशारा हजारे
यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर
यांना पाठवले आहे. अण्णांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राळेगणसिद्धीत उपोषण
सुरू केले होते.

दुसऱ्या
दिवशी राधामोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिले. केंद्रीय कृषिमूल्य आयोगास
निवडणूक आयोगाप्रमाणे संवैधानिक दर्जा देऊन स्वायतत्ता देण्यात यावी,
स्वामीनाथन आयोगाच्या शिफरशींनुसार शेती उत्पादनांचे मूल्य निर्धारित करणे,
फळे, भाजी, तसेच दुधाचे किमान दर निश्चित करणे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त
करण्यासाठी उपाययोजना, आयात-निर्यात धोरण निश्चित करणे, आधुनिक पद्धतीची
कृषी औजारे, तसेच पाणी वाचवण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनासारख्या
साधनांवर ८० टक्के अनुदान लागू करणे या मागण्यांवर विचार करून निर्णय
घेण्यासाठी उच्चाधिकार समिती तत्काळ स्थापन केली जाईल, या समितीत तत्कालीन
कृषी राज्यमंंत्री सोमपाल शास्त्री, निती आयोगाचे सदस्य रमेशचंद्र
यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश करण्यात येणार होता.

उच्चाधिकार
समिती ३० ऑक्टोबर २०१९ पूर्वी अहवाल सादर करणार होती. या समितीच्या
अहवालानुसार केंद्र सरकार कार्यवाही करील, असे आश्‍वासन ५ फेब्रुवारी २०१९
रोजी कृषिमंत्री सिंह, मुख्यमंत्री फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री भामरे
यांनी राळेगणसिद्धीत येऊन दिले होते. मात्र, ते फोल ठरले. त्यामुळे पुन्हा
उपोषण सुरू करण्याचा विचार आहे. कधी व कोठे उपोषण करणार याची पत्र पाठवून
माहिती देऊ, असे हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सात तास मनधरणी
: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारेंची तब्बल सात तास मनधरणी केली
होती. मागण्यांबाबत तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांनी कालबद्ध
कार्यक्रम निश्चित केला. मात्र, या आश्वासनाचा केंद्र सरकारला विसर पडला.


Tags: राज्य
Previous Post

आंदोलनाचा 19वा दिवस : शेतकरी म्हणाले – रातोरात संघटना उभ्या, नावेही ऐकली नाहीत

Next Post

Phaltan : खास लग्नसराई निमित्त दागिन्यांच्या घडणावळीवर ५० ते १०० % सूट मिळवण्याची संधी ती हि फक्त शांतीकाका सराफ अँड सन्स मध्येच

Next Post

Phaltan : खास लग्नसराई निमित्त दागिन्यांच्या घडणावळीवर ५० ते १०० % सूट मिळवण्याची संधी ती हि फक्त शांतीकाका सराफ अँड सन्स मध्येच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आज मलठणमध्ये सावरकर गौरव यात्रा; खासदार रणजितसिंह यांची उपस्थिती

एप्रिल 2, 2023

डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा शुक्रवार, दि. ७ एप्रिलला उद्घाटन सोहळा

एप्रिल 2, 2023

राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडणार्‍या माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर; खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

एप्रिल 2, 2023

प्रवचने – मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?

एप्रिल 2, 2023

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एप्रिल 2, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

एप्रिल 2, 2023

लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

एप्रिल 2, 2023

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनिल केळगणे यांनी साधली आर्थिक प्रगती

एप्रिल 2, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!