फलटण शहरात आजपासून पाणी कपात


स्थैर्य, फलटण, दि. 7 : फलटण शहरामध्ये फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून होत असणाऱ्या पाणीपुरवठा मध्ये 30 टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर म्हणाले की, नीरा उजवा कालवा बंद असल्याकारणाने फलटण शहरामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठा मध्ये कपात करण्यात आलेली आहे. तरी फलटण शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी पाण्याचे साठवण करून ठेवावे. व पाणी काटकसरीने वापरून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ही या दरम्यान मुख्याधिकारी काटकर यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!