• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे – हेमंत पाटील

सभागृहात गदारोळापेक्षा विधायक चर्चेला विरोधकांनी समोर जावे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 6, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । मुंबई । राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उपस्थित केले आहेत.अशात केवळ विरोधकांनी विरोधासाठी विरोध करून चालणार नाही.राज्यातील समस्या फक्त विधायक मार्गानेच सोडवता येवू शकतात.अशात विरोधकांनी विधिमंडळातील गदारोळ थांबवून चर्चेला समोर जाण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यातील बेरोजगारी तसेच महागाई संदर्भात विरोधकांनी महत्वाची प्रश्न उपस्थित करीत या समस्या मार्गी लागवून घेतले पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी विरोधकांना केले. ‘कांदा’ शेतकऱ्यांना रडवत आहे. याप्रश्नावर योग्य निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करण्यासाठी विरोधकांनी सरकारला भाग पाडले पाहिजे. पंरतु, विरोधक केवळ राजकीय विरोध करीत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

केवळ दोनच आठवडे हे अधिवेशन चालणार असल्याने विविधमंडळाचा वेळ हा अत्यंत बहुमूल्य आहे.अशात गदारोळ, आरोप प्रत्यारोपात सभागृहाचा वेळ वाया घालण्यापेक्षा विविध प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मत पाटील यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकार विरोधकांचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेत नव्हते. हे सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होण्यासाठी विरोधकांनी सर्वसामान्य आणि सरकारमधील दुव्याचे कर्तव्य पार पाडणे सध्या अत्यंत आवश्यक आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवरील महागाईचे संकट कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारवर आहे.अशात सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देखील पाटील यांनी केले.

विद्यामन विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर विरोधकांना देखील योग्य प्रतिनिधित्व देत आहेत.अशात मिळालेल्या या वेळाचा विधायी कार्यासाठी विरोधकांनी पुरेपुर वापरावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. भांडण करून, एकमेकांवर चिखलफेक करण्यात सभागृहाचा वेळ वाया घालणे योग्य नाही, असे देखील पाटील म्हणाले. शिंदे-फडणवीसांनी अत्यंत जबाबदारीने राज्याचा कारभार करीत आहेत. अशात सरकारला सर्वसामान्यांच्या हितासाठी विरोधकांनी साथ देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.


Previous Post

शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित आघाडी फलटण तालुक्यात आगामी निवडणुका एकत्रित लढणार; नागरिकांना आश्वासक वाटेल असा पर्याय देणार

Next Post

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Next Post

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

ताज्या बातम्या

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023

महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे २४ ते २६ मार्च कालावधीत प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मार्च 21, 2023

उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!