स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात काँग्रेसला पुन्हा क्रमांक एकवर आणणे पटोलेंसमोर आव्हान, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे प्रतिपादन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 7, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, नागपूर, दि.७: मी १९८७ ते ९५ अशी सात वर्षे युवक काँग्रेस आणि २००८ ते २०१५ अशी सात वर्षे प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्या वेळी राज्यात काँग्रेस क्रमांक एकवर होती. आता राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला पुन्हा क्रमांक एकवर आणणे हे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरील माेठे आव्हान आहे, असे रोखठोक प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी “िदव्य मराठी’शी बोलताना केले.

पक्षबांधणी करताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे महत्त्वाचे आहे. नाना पटाेले यांच्यात ती क्षमता आहे. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. सध्याचा काळ जशास तसे वागण्याचा आहे. पूर्वी एक दुसऱ्याचा आदर-सन्मान ठेवून प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. आता हे तारतम्य कोणालाच राहिलेले नाही. शिस्तबद्ध आणि संस्कारी पक्ष असलेल्या भाजपनेही संस्कार गुंडाळून ठेवले आहेत. एकेकाळी स्लेजिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सौरभ गांगुलीनेच रोखले. तिथे विराट कोहली आणि गांगुलीच हवा. तसे भाजपला रोखण्यासाठी नाना पटोलेच हवेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मी अध्यक्ष झालो त्या वेळी संघटनात्मक बांधणी हे माझ्यासमोरील आव्हान होते. कारण, सहा महिन्यांवर लोकसभा व त्यानंतरच्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होत्या. संघटनात्मक बांधणी झालेली नव्हती. ब्लॉक अध्यक्ष, अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष तसेच बूथ कमिट्या नव्हत्या. सुरुवातीचे सहा महिने पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले.

पूर्वीसारखा जिल्हाध्यक्षांचा वचक नाही
तत्कालीन यंत्रणेत जिल्हाध्यक्ष सार्वभौम हाेते. ते म्हणतील ते फायनल होते. पण जिल्हाध्यक्ष सर्वसंमतीने होत नाही. त्यामुळे त्याचा वचक राहत नाही. म्हणून ब्लॉक अध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांनाही अधिकार दिले. ४ ते ५ महिने संघटन मजबूत केले. त्याचा फायदा झाला. लोकसभेच्या राज्यात १३ जागा होत्या. त्या १८ झाल्या. विधानसभेच्या ६४ वरून ८४ झाल्या, तर एनसीपी ७२ वरून ५४ वर आली. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला ब्लॉक अध्यक्षांना बोलवायला सुरुवात केली. प्रदेश युवक काँग्रेसचाही मी सात वर्षे अध्यक्ष होतो. जयंत पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील हे सर्व माझ्या कार्यकारिणीत हाेते हे ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

आता युवक काँग्रेस अलिप्त
युवक काँग्रेस निवडणुकीत झालेल्या बदलामुळे अलिप्त आहे. गावपातळी, तालुका व जिल्हा पातळीवर मतदानाद्वारे अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे ही अलिप्तता आली आहे. या पद्धतीत काही गुणदोष आहेत. इतर संघटनांमध्ये हवा तसा समन्वय नाही. आता पूर्वीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यातून नव्या अध्यक्षांना मार्ग काढायचा आहे. नाना पटोले यांच्यात कौशल्य आणि क्षमता आहे. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. काँग्रेस परत क्रमांक एकवर येण्यास वेळ लागणार नाही…


ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबाद : उद्योगाला वीज बिलावर मिळणारी सबसिडी रद्द, महिन्याला लाखो रुपयांचा फटका

Next Post

दिल्लीमध्ये 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढणार : राकेश टिकैत यांची घोषणा, मोदींनी पुढाकार घेतला तर कोंडी फुटेल : पवार

Next Post

दिल्लीमध्ये 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढणार : राकेश टिकैत यांची घोषणा, मोदींनी पुढाकार घेतला तर कोंडी फुटेल : पवार

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.