स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे, पक्ष म्हणून गांभीर्याने विचारा करावा लागेल- शरद पवार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 14, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि.१४: महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लागलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण धवळून निघाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंडेंवरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे बुधवारी मला भेटले होते. मुंडेंनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडेंचे काही व्यक्तींशी संबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले’, असे पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, ‘धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर, त्यांना विश्वासात घेऊन मुंडेंनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ’, असे पवार म्हणाले.

नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाहीत- पवार

विशष म्हणजे, शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत रोखठोक मत मांडले असले, तरी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. ‘नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी?

Next Post

WHO ची 10 सदस्यांची टीम चीनमध्ये पोहोचली, वुहानमधून महामारी कशी सुरू झाली याचा तपास केला जाणार

Next Post

WHO ची 10 सदस्यांची टीम चीनमध्ये पोहोचली, वुहानमधून महामारी कशी सुरू झाली याचा तपास केला जाणार

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.