स्थैर्य, मल्हारपेठ, दि.५: रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गटार बांधून देतो, असे आश्वासन दिल्यानंतर रखडलेल्या येथील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या 15 दिवसांपासून पोलिस स्टेशन ते हायस्कूलपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम येथील स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यानंतर रस्ते विकास महामंडळ व कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर गटार कामाच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर रखडलेल्या कॉंक्रीट रस्त्याला सुरवात झाली. कंपनीच्या विस्कळीत कारभारामुळे 15 दिवस स्थानिक नागरिकांना वाहनांच्या धुळीचा व वर्दळीचा त्रास सहन करावा लागला.