स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ना.श्रीमंत रामराजेंची विजयाची हॅट्रीक; महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर

Team Sthairya by Team Sthairya
June 20, 2022
in अग्रलेख, इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, विशेष लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. २० जुन २०२२ । मुंबई । प्रसन्न रूद्रभटे । महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग तिसर्‍यांदा विजयी झाले असून या निकालामुळे राज्याच्या राजकारणातील ना.श्रीमंत रामराजे यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या निकालामुळे ना.श्रीमंत रामराजे यांची सन 1991 पासूनची सलग 31 वर्षांची यशस्वी राजकीय घोडदौड आणखीन पुढील 6 वर्षांसाठी सुनिश्‍चित झाली आहे. दरम्यान, या निकालामुळे फलटणसह सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी २८ मते मिळवुन विजयाची मोहर उमटवली आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राज्यात असणारा दबदबा पुन्हा एकदा दिसुन आला आहे. आज झालेल्या मतदानात व त्यांनतर करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते मिळाली आहेत व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

राज्यपातळीवरील राजकारणात सुरुवातीला सन 1995 पासून सन 2009 पर्यंत विधानसभेवर आमदार म्हणून सलग 15 वर्षे निवडून गेलेल्या ना.श्रीमंत रामराजे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सलग तिसर्‍यांदा विजयी होण्याचा इतिहास घडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खा.शरद पवार यांनी राज्यपातळीवर नेतृत्त्व करण्याची वारंवार दिलेली संधी ना.श्रीमंत रामराजेंचे राजकीय महत्त्व स्पष्ट करणारी आहे.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

ना.श्रीमंत रामराजे हे 1995 नंतर राज्याच्या राजकारणात फलटणचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून ते आजही फलटण, माण, खटाव, खंडाळा, उत्तर कोरेगाव या कायम दुष्काळी तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी गेली सुमारे 30 वर्षे सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामध्ये खा. शरदराव पवार यांचे मार्गदर्शन आणि ना. अजित पवार यांचे सहकार्य लाभल्यानेच दुष्काळी पट्ट्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यापर्यंत सोडविण्यात ते यशस्वी झाले आहेत.

1995 पासून दुष्काळी पट्ट्यातील शेतीच्या पाण्यासाठी काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली संधी आणि सर्वसामान्य मतदारांनी दिलेला एकमुखी पाठींबा यामुळेच या प्रश्‍नासाठी प्रयत्न करू शकल्याची भावना कायम ठेवून केवळ पाटबंधारे प्रकल्पाचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आला म्हणून समाधान न मानता या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता करून घेऊन या प्रकल्पाचे पाणी सर्वसामान्यांच्या शेतापर्यंत आणेपर्यंत तथापि त्यानंतरही या पाण्यातून पिकलेल्या शेतमालावर, फळबागावर प्रक्रिया करून या भागातील शेतकरी केवळ शेतकरी न राहता तो उद्योजकहीं बनला पाहिजे हा शरद पवार यांच्या विचारांचा पाठपुरावा करण्यात ते मागे राहिले नाहीत.

निरा – देवधर आणि धोम – बलकवडी हे दोन्ही पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होऊन त्यामध्ये साठविण्यात आलेले पाणी कालव्याद्वारे दुष्काळी पट्ट्यातील शेतापर्यंत आणण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर खा. शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहिले असून धोम – बलकवडीचे पाणी खंडाळा आणि फलटण तालुक्यापर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे. फलटण तालुक्याचा विचार केला तर याच विकासकामांच्या जोरावर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर ना.श्रीमंत रामराजे यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

सन 2010 सालापासून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे गेली 7 वर्षे या सभागृहाचे ते सभापतीपदाचे सर्वोच्च पद मोठ्या कौशल्याने भूषवत आहेत. विशेष बाब म्हणजे या 7 वर्षातील सुमारे 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत देखील नव्हती. वि.स.पागे, जयंतराव टिळक, प्रा.ना.स.फरांदे अशा दिग्गजांची परंपरा लाभलेले हे विधान परिषदेचे सभापतीपद घटनात्मक चौकटीत राहून तितक्याच ताकदीने व कौशल्याने भूषविण्याचे कौशल्य ना.श्रीमंत रामराजे यांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले होते. आता नव्याने पुढील 6 वर्षांकरिता ना.श्रीमंत रामराजे यांची पुन्हा एकदा विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर सभापतीपदीही तेच कायम राहतील, असा स्पष्ट विश्‍वास राजकीय वर्तृळातून व्यक्त केला जात आहे.

Related


Previous Post

प्रवचने – ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

Next Post

डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा जागर आणि स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत साहित्य संमेलन – माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख

Next Post

डॉ .शंकरराव खरात यांच्या साहित्याचा जागर आणि स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत साहित्य संमेलन - माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख

ताज्या बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

August 15, 2022

नवीन नागपूरच्या नियोजनबद्ध विकासाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

रानभाजी महोत्सावाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जिल्ह्यात ‘वाचक वाढवा’ मोहिमेस सुरुवात

August 15, 2022

सदरबझार पोलीस चौकीच्या नुतन इमारतीचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

जिल्ह्याच्या विकासाची परपंरा अधिक वृद्धिंगत करणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

August 15, 2022

महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल; सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

August 15, 2022

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

August 15, 2022

सरड्याच्या नवनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निराधार महिलांना साड्यांचे वाटप

August 15, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!