• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

माण-खटाव मध्ये उन्हाळ्यात जिहे-कठापुर योजनेचे पाण्यासाठी शिवतारे यांनी दिला दिलासा

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 29, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२९: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत जिहे -कठापुर योजनेला गती दिली.आज ही मंत्री नसतानाही त्यांनी माण-खटावला पाणी देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात उन्हाळ्यात पाणी मिळणार आहे. हा एक प्रकारे दिलासादायक संदेश असल्याचे मत दुष्काळी भागात व्यक्त होत आहे. माण-खटाव दुष्काळी भागातील शेतकरी व इतर जनतेला पाणी देण्यासाठी खऱ्या अर्थाने माजी पालकमंत्री विजय शिवतारे हे दुष्काळी भागातील जनतेच्या मनातील ताईत ठरले आहेत अशी भावना खटाव तालुक्यातील १६ व माण तालुक्यातील १९ गावाच्या परिसरातील ग्रामस्थांची झाली आहे. नेर ते आंधळी धरण असा सतराशे मीटर बोगद्यातून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करून खऱ्या अर्थाने तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचे कार्य माजी पालक मंत्री विजय शिवतारे यांनीच केले आहे.१९९६ साली सांगली जिल्ह्यातील विटा, आटपाडी भागाला पाणी देण्यासाठी कराड नजिक कृष्णा नदीच्या काठावर टेंभू योजना सेना-भाजप च्या तात्कालीन सरकारने कार्यन्वित केली होती. त्याला सत्तांतर नंतर खीळ बसली होती. पण,२०१४ साली भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा राज्य मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून जिहे- कठापुर योजनेला निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचा आता दुष्काळी भागातील दरुज, दरजाई, साते वाडी, पेढगाव,मांडवे, एनकुळ, कणसे वाडी, मायणी येथील सोळा गावे व माण तालुक्यातील १९ गावांना लाभ मिळणार आहे. ”’माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांनी रचला पाया, माजी मंत्री विजय शिवतारे झाले कळस”’ असे वर्णन केले जात आहे. कोणतीही खोटी माहिती प्रसिद्ध न करता जे यश मिळाले हा सत्याचा विजय असल्याची माहिती आता भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुध्दा देऊ लागले आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगरे, रमेश बोराटे,प्रताप जाधव यांनी मत व्यक्त केले आहे. सत्ता नसतानाही माजी पालकमंत्री,माजी आमदार यांनी केलेला अभूतपूर्व प्रयत्न माण-खटावची जनता कदापि विसरणार नाही. हे यानिमित्त सिद्ध झाले आहे.


Tags: सातारा
Previous Post

न्यायालयाची पायरी न चढता तलाठी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दिला न्याय

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग,  ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग,  ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!