• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

न्यायालयाची पायरी न चढता तलाठी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दिला न्याय

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 29, 2020
in Uncategorized

 

दोन्ही गावच्या हद्दीमध्ये  तलाठी  गणेश बोबडे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ करताना (छाया-निनाद न्यूज, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.२९: ग्रामीण भागामध्ये जमीन व वाटणीचा वाद तसेच इतर कारणांमुळे अनेकदा ग्रामस्थांना पोलीस ठाणे व दिवाणी न्यायालयाची पायरी चढावी लागते. याचा अनुभव अनेक पिढ्यानी घेतला आहे. पण खटाव तालुक्यातील विसापूर- रेवलकरवाडी हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने तलाठी गणेश बोबडे यशस्वी मध्यम मार्ग काढल्यामुळे ग्रामस्थांनी या हद्दीच्या रस्त्यावर कामकाज सुरू करताना श्री बोबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सत्कार करून पुढील कामांचा ‘श्री गणेशा ‘केला. 

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विसापूर व रेवलकरवाडी ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी सामंजस्याची भूमिका घेऊन बैलगाडी जाण्याइतकी दोन्ही हद्दीच्या मधून सर बांध वाट तयार केली होती.दोन्ही बाजूंनी पाच फूट अंतर ठेवले होते. त्यावेळी लोकसंख्या कमी असल्याने रस्त्याची अडचण भासत न्हवती. पण अलीकडच्या काळात वाढते अतिक्रमणे व वाहनांची संख्या वाढली तसेच यंत्र सामुग्री सुद्धा आली. अशावेळेला हद्दीचा प्रश्न अधिकच बिकट बनला. भविष्यात या दोन्ही गावचा वाद मिटावा यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी खटावचे तहसीलदार, मंडलधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तलाठी गणेश बोबडे यांनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या पाच ते सहा वेळा बैठका घेतल्या. प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. त्यामध्ये दोन्ही गावची युवा पिढी सकारात्मक असल्याचे पुढे आले. त्यामुळे श्री बोबडे यांनी सुद्धा महसुली कामाची जबाबदारी स्विकारत रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी पार पाडली. 

गावचे प्रतिष्ठित नागरिक पै.सागरभाऊ साळुंखे, सूर्यकांत शिंदे, रघुनाथ मोरे, विजय जाधव, रोहिदास बिटले, धनाजी जाधव, गणपत पवार, विजय बिटले यांनीही हा हद्दीचा व रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल संबंधित महसूल विभागाचे तत्कालीन खटाव तहसीलदार डॉ अर्चना पाटील व विद्यमान तहसीलदार किरण जमदाडे आणि महसूल विभागाचे आभार मानून प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामस्थ व महसूल तलाठी अमोल बोबडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये समज, गैरसमजीतून वाद होतात. त्यातून दोन्ही बाजूच्या रक्तातील नात्याच्या ग्रामस्थांना पोलीस ठाणे व न्यायालयात दाद मागण्याची वेळ येते. कायदेशीर कारवाई व तारीख पे तारीखने पैसे व वेळ वाया जातो. या सर्व बाबींना फाटा देऊन आता या वाचलेल्या खर्चातूनच दोन्ही गावच्या हद्दीत चांगला रस्ता तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागामध्ये तंटामुक्त अभियान, हागणदारी मुक्त, कुऱ्हाडबंदी, पाणंद रस्ते मोकळे करणे ही योजना यशस्वीपणे राबवली.त्यामुळे काही गावात रोगराई नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे.असे ग्रामस्थांनी यापूर्वीच नमूद केले आहे. विसापूर व रेवलकरवाडीच्या ग्रामस्थांनी सामंजस्यची भूमिका घेतल्याने संपूर्ण सातारा जिल्हयात दोन्ही ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. 

दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केल्यामुळे तसेच सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल विभागाला सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार किरण जमदाडे यांनी कौतुक करून त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 


Tags: सातारा
Previous Post

जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

Next Post

माण-खटाव मध्ये उन्हाळ्यात जिहे-कठापुर योजनेचे पाण्यासाठी शिवतारे यांनी दिला दिलासा

Next Post

माण-खटाव मध्ये उन्हाळ्यात जिहे-कठापुर योजनेचे पाण्यासाठी शिवतारे यांनी दिला दिलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!