स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना गाजीपूर सीमेवर अडवले, आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 4, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.४: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच गाजीपूर सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली होती. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाजीपूस सीमेवर गेल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत इतर खासदार देखील आहेत. दरम्यान त्यांना गाजीपूर सीमेवर अडवले आहे. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेेण्यासाठी गेले आहेत. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवण्यात आले आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेक खासदार आहेत. या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदारांचा समावेश आहे. विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार यासाठी एकत्र आले आहेत. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

सीमेवर जाण्याविषयी काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे…
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार ज्या पध्दतीने शेतकऱ्यांची वागत आहे. ते पाहून दुःख होत आहे. तसेच मराठीत एक म्हण आहे की, अन्नदाता सुखी भवः… मात्र आज अन्नदाता हा आंदोलन करत असताना दिसतोय. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी लवकर शेतकऱ्यांची चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. मी आज गाजीपूरला जाऊन शेतकरी आंदोलकांशी चर्चा करणार’ असे सुळेंनी स्पष्ट केले. एएनआय या न्यूज एजेंसीला त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली होती. याविषयी बोलताना राऊत म्हणाले होते की, देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करणे त्यांचे कर्तव्य आहे. पुढे ते म्हणाले की, ‘राकेश टिकैत यांच्यासोबत आम्ही यापूर्वी फोनवर बोललो होतो. मात्र प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला’

ADVERTISEMENT
Previous Post

इंधन दरवाढीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रावर टीकास्त्र

Next Post

ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली

Next Post

ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.