• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवचने – काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 17, 2023
in इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा त्या मार्गाने आपण जावे. सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. व्यवहार सोडू नये, प्रयत्‍नही कसून करावा; परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे. आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो, तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. काळजी न करतादेखील प्रयत्‍न होणार नाही असे नाही. उलट, प्रयत्‍न दुप्पट करावेत; पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की, आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहात नाही. एक म्हणतो की, मला लोकांच्या ‘देण्याची’ काळजी आहे; दुसरा म्हणतो की, मला लोकांकडून माझे येणे ‘येण्याची’ काळजी आहे; तर तिसरा म्हणतो की, मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळयामध्ये आपली स्वतःची काळजी कुणालाच नाही. मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे ? यावर रामबाण असा एकच उपाय आहे; तो म्हणजे, आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.

एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की, “काय करावे, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही, नुसता हसतखेळत दिवस घालवितो; पुढे याचे कसे व्हायचे ?” मी म्हटले, “तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते; पण वास्तविक पाहता ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला, आणि भगवंताला विसरला, इतकेच ना ? मग तेच तुमच्या मुलाला का शिकविता ? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे; पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन.” तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे ? ‘असले तर असू दे आणि नसले तर नसू दे,’ अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.

ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही.


Previous Post

अवकाळी पाऊस आणि वीज पडल्याने उभ्या पिकांचे झाडे, वैरणीचे नुकसान

Next Post

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाची एहसास संस्थेस भेट, जपली सामाजिक बांधिलकी

Next Post

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाची एहसास संस्थेस भेट, जपली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!