• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सापडलेला तीन लाखांचा ऐवज प्रामाणिकपणे केला परत अपशिंगेतील दोन युवकांचा सातारा पोलिसांकडून सत्कार 

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 23, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२२: कोल्हापूरला जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या हँडलला अडकवेली बॅग लिंबखिंड परिसरात पडली होती. दागिने व रोख रक्कम असा तीन लाख ऐवज असलेली ही बॅग सापडल्यानंतर प्रामाणिकपणे परत करणार्‍या दोन युवकांचा सातारा तालुका पोलिसांनी सत्कार केला. 

याबाबत माहिती अशी, दि. 22 रोजी यशवंत हरि पाटील रा. कडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हे कडगाव येथून मोटारसायकलवरून पत्नीसोबत पुणे येथे जात होते. यावेळी लिंबखिंड ते गौरीशंकर दरम्यान त्यांच्या मोटारसायकलच्या हॅन्डेलला अडकवलेली बॅग बंध तुटून पडली. या बॅगमध्ये सोन्याचे एक गंठण व एक नेकलेस असा एकूण अंदाजे सहा तोळे वजनाचे 3 लाख रुपयांचा ऐवज होता. बॅग पडल्याचे लक्षात येताच यशवंत पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बॅग हरवल्याची माहिती दिली. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. यानंतर पोलीस बॅगेबाबत इतरत्र शोध घेत होते.

स्वाभिमानीचा सातार्‍यातील आक्रोश मोर्चा रद्द; 5 डिसेंबरच्या बैठकीत निर्णय न झाल्यास हातात दांडके घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा

यावेळी अपशिंगे, ता. सातारा गावातील अ‍ॅड. आशिष प्रल्हाद बुधावले व त्यांचे मित्र कल्याण नामदेव भोसले हे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी कामानिमीत्त वाई याठिकाणी जात असताना लिंबखिड ते गौरीशंकर दरम्यान एक बॅग सापडली असल्याची माहिती दिली व या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले असून ज्या कोणाची बॅग आहे त्याचा शोध घेवून त्याकडे सुपूर्द करण्याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना माहिती देवून त्याची खात्री करून त्यांना हे दागिने पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या समक्ष ताब्यात देण्यात आले आहेत.

अ‍ॅड. आशिष प्रल्हाद बुधावले व कल्याण नामदेव भोसले दोघांनीही प्रामाणिकपणे राहून तसेच कोणतेही आमिष न बाळगता हा किंमती ऐवज पोलीस ठाण्यात आणून दिले. या प्रामाणिकपणाबद्दल पोनि सजन हंकारे व यशवंत हरी पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे आभार मानले व मनपूर्वक कौतुक केले.

पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेणार


Tags: सातारा
Previous Post

सैन्यात मेजर असल्याचे सांगून १७ कुटुंबांना गंडा; ६ कोटींची लूट

Next Post

स्वाभिमानीचा सातार्‍यातील आक्रोश मोर्चा रद्द; 5 डिसेंबरच्या बैठकीत निर्णय न झाल्यास हातात दांडके घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा

Next Post

स्वाभिमानीचा सातार्‍यातील आक्रोश मोर्चा रद्द; 5 डिसेंबरच्या बैठकीत निर्णय न झाल्यास हातात दांडके घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!