स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

संत कबीरांचे विचार देशाला मार्गदर्शक ठरतील – सरसेनानी आनंदराज आंबेडकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 25, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । राम रहमान बाजूला ठेवून अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा संदेश देत तेराव्या शतकात अंधश्रद्धेच्या विरोधात संत कबीरांनी मोठा लढा देत क्रांती घडवली मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या दोह्यातून तत्वनिष्ठ विचारांची पेरणी केली ते विचार आजही सद्यपरिस्थितीत लागू पडतात त्याच बरोबर सरसेनानी आनंदराज आंबेडकर आपल्या भाषणात पुढे असे म्हणाले की “तेराव्या चौदाव्या शतकात नाथपंथ आणि सुफिपंथ यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माचा प्रभाव होता प्रभाव संत कबीरांवर पडल्यामुळे त्यांनी आपल्या दोह्यात मानवी जीवन, अंधश्रद्धा आणि सामाजिक जडणघडण यावर आपले जे विचार मांडले आणि आपल्या दोह्यामधून ते व्यक्त केले अशा अनेक दोह्यांचे उदाहरण देऊन त्यांचा भावार्थ स्पष्ट केले, नदीमध्ये डुबकी मारणारा माणूसच वर येताना नदीतून काहीतरी घेऊन येतो परंतु पाण्याला घाबरून नदीकिनारी बसलेला माणूस काहीही करू शकत नाही असे अनेक उदाहरणं त्यांनी सर्वांसमोर मांडले, त्यासोबतच कबीरांनी सांगितलेले “कल करे सो आज कर आज करे सो अब” या विचारांची गरज सध्या युवा पिढीला आहे असे ही मत त्यांनी व्यक्त केले त्यासोबतच आज देशाची राष्ट्रपती आदिवासी महिला होऊ शकली हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा विजय आहे परंतु याच राष्ट्रपतींनी मी हे राष्ट्र हिंदुराष्ट्र बनवेल असे व्यक्तव्य मांडले त्यावर आपण चिंतन करणे आवश्यक आहे असेही मत त्यानी व्यक्त केले, संत कबीरांचे विचार देशाच्या विकासामध्ये मार्गदर्शक ठरतील असे वक्तव्य त्यांनी प्रवचन मालिकेच्या अध्यक्ष भाषणामधून मांडले.

बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समिती विद्यमाने वर्षावास मालिका आयोजित करण्यात आली आहे या सदर कार्यक्रमास उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब, सरचिटणीस राजेश घाडगे साहेब, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, अतिरिक्त सरचिटणीस रवींद्र पवार, चिटणीस श्रीधर साळवी, संदेश खैरे, साहित्य कलाक्रीडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गमरे, गटप्रतिनिधी तुकाराम घाडगे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव आणि व्यवस्था मंडळाचे सर्व सभासद, विविध उपसमितीचे अध्यक्ष, चिटणीस, उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, बौद्धचार्या आदी लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी केला तर सूत्रसंचालनाची धुरा मनोहर बापू मोरे यांनी पेलवली.

कार्यक्रमाचे चौथे पुष्प शरद देशपांडे यांनी गुंफले त्यांनी आपल्या प्रवचनात म्हटल की “जन्म देताच ज्याला जन्मदात्री आईने नदीकाठी सोडून दिलं असा एक अनाथ अशिक्षित मुलगा ज्याच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माचा प्रभाव पडल्याने तो हिंदी संत साहित्यामधील महामेरू संत कबीर म्हणून नावलौकिकास आला, अशा संत कबीरांना प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी आपले गुरू मानलं त्यामागचं कारण म्हणजे त्यांचा त्याग, त्यांनी केलेली क्रांती आणि त्यांनी आपल्या दोह्यातून मांडलेले विचार याचा अभ्यासपूर्वक विचार करूनच बाबसाहेबांनी त्यांना आपल गुरु मानल, संत कबीरांबद्दल अभ्यासपूर्ण व चिंतनशील माहिती देत त्यांच्या दोह्यांचे सादरीकरण करून या विचारांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करायला हवा असे विचार पाऊण तासाच्या आपल्या प्रवचनात त्यांनी मांडले व संत कबीरांचे संपूर्ण जीवन सादर करून सर्व उपस्थित जनसमुदायास मंत्रमुग्ध केले.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस मनोहर बापू मोरे यांनी सर्वांचे आभार मानून शेवटची गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Related


Previous Post

वृक्षारोपणातून कै.वसंतराव शेंडगे यांची स्मृती जपण्याचा उपक्रम स्तुत्य : श्रीमंत संजीवराजे

Next Post

विकासासाठी मोदी सरकारकडून ८ वर्षात ९०.९ लाख कोटी रुपये खर्च – इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

विकासासाठी मोदी सरकारकडून ८ वर्षात ९०.९ लाख कोटी रुपये खर्च - इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!