स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पुन्हा निर्बंध लावणार, कोरोना नियंत्रणासाठी राजेश टोपेंचा कडक इशारा

Team Sthairya by Team Sthairya
November 24, 2020
in Uncategorized

 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

स्थैर्य, जालना, दि.२४ : एकीकडे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची मोठी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना शोधण्यात पुणे पोलिसांना ३३ दिवसांनंतर यश

आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. मास्क वापरले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला काही कडक पावलं टाकावीच लागतील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहेत. त्यामुळे तिथे जे निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लावावे लागतील, असे टोपे म्हणाले.

पुनर्वसन मंत्र्यांनीही दिले संकेत

मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने ५ हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ‘राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातोय. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्त्वाचं आहे,’ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील. मुंबई कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथे लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसेच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

Related


Tags: राज्य
Previous Post

कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला; सांगलीचे पाच जण गजाआड: जुन्या भांडणातून दिली होती सुपारी

Next Post

‘सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो, त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही’- शरद पवार

Next Post

'सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो, त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'- शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉल्बी का वाजू नये याचे उत्तर प्रशासनाने द्यावे – खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात रोखठोक पवित्रा

August 20, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

August 20, 2022

अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

August 20, 2022

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

August 20, 2022

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

August 20, 2022

प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

August 20, 2022

माजी सैनिकांसाठी काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

August 20, 2022

सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

August 20, 2022

मुख्यमंत्री प्रणित जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

August 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

August 20, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!