स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो, त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही’- शरद पवार

Team Sthairya by Team Sthairya
November 24, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.२४: भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. ‘सत्ता गेल्याच्या नंतर त्रास होतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं असे शब्द वापरत असतील, तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही,’ असा टोला पवारांनी लगावला.

मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पवार म्हणाले की, ‘सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे. साहजिक माणसाने काही आशा, अपेक्षा ठेवावी. त्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.’ कालही ते असंच काही बोलले होते. पण, ठीक आहे, लोकं त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. ती अतिभावना असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे’, असे मत पवारांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

‘रावसाहेब दानवेंचा नवीन गूण मला कळाला’

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी परत भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसे सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही,’ असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.

‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर’

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे,’ असे म्हणत सरनाईक यांच्यावरील कारवाईचा पवारांनी निषेध केला.

‘दिल्लीत वेगळे राज्य असेल तर राज्य चालवणे कठीण असते. लोकांची कामे करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. आज जे सरकार चालू आहे, त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नैराश्यपणा भाजप नेत्यांमध्ये आला आहे, त्याचे हे प्रतिक आहे’, असा टोला पवारांनी भाजपला लगावला.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: राज्य
Previous Post

पुन्हा निर्बंध लावणार, कोरोना नियंत्रणासाठी राजेश टोपेंचा कडक इशारा

Next Post

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

Next Post

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!