स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक घेणार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 1, 2021
in इतर

स्थैर्य, मुंबई, दि.०१: असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात 05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या वर्षी लॉकडाऊन कालावधी वाढल्याने असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार आपापल्या गावी परत निघाले. त्यावेळी त्यांना परत जाताना खूप कष्ट घ्यावे लागले. अनेकजण कित्येक दिवस व कित्येक किलोमीटर चालत गेले रस्त्यात जेवणाची आबाळ झाली, राहण्याचीही गैरसोय झाली. विशेषतः लहान मुले व वयोवृद्धांना खूप त्रास सहन करावा लागला. या कालावधीत शासनाने विविध उपाययोजना केल्या. लाखो नागरिकांना शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे त्यांच्या परराज्यातील गावी मोफत सोडले. अनेक ठिकाणी जेवणाची सोय, राहण्याची सोय व वैद्यकीय सोय केली. गावी जाईपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाने खूप चांगले नियोजन केले, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

लॉकडाऊन उठल्यानंतर मिशन बिगिन अगेन सुरू झाले. अनेक कामगार पुन्हा आपापल्या रोजगाराच्या शहरामध्ये परतले, त्यांचा संसार पुन्हा योग्य पद्धतीने सुरू होतोय तोपर्यंत पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे त्यामुळे पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले आहेत असे अनेक सामाजिक संघटना सांगत आहेत. अशा वेळी आकस्मिक निर्माण झालेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शासनाची पूर्वतयारी असावी म्हणून लवकरच सार्वजनिक आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, परिवहनमंत्री, यांचे समवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सर्वांशी सविस्तर बोलणे झाले आहे. या बैठकीत असंघटित कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी व पत्रकार संशोधकांनाही निमंत्रित करणार आहोत, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या बैठकीत शासनाचे प्रवासासाठीचे नियोजन, अन्न, निवारा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन बाबत चर्चा होईल. कोरोना रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ गोऱ्हे यांनी केले आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

औंध येथे चाळीस वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

Next Post

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

Next Post

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.