स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महिला मेळाव्याचे योग्य नियोजन करावे – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
May 14, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । नागपूर । राज्यात प्रथम जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन दिवसीय विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्याला गणमान्य सेलिब्रिटी येणार आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यात सात हजार महिला बचत गट आहेत. त्यानुषंगाने या मेळाव्याचे योग्य नियोजन करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिल्या.

या मेळाव्याची रुपरेषा ठरविण्यासाठी  शहरातील रवी भवन येथे पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी  बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला,  मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती  उज्ज्वला बोढारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकूरवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. केदार पुढे म्हणाले की, या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी  दिल्लीचे मानांकित बचत गटाचे प्रतिनिधी येणार असून महिला बचत गटांना ऑनलॉईन मार्केटींग, मेट्रो स्टेशन मॅनेजमेंट, फुड मॅनेजमेंट आदिबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रशिक्षण सत्राचे आयोजन करुन महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आर. विमला यांना महिला मेळाव्याच्या आयोजनाबाबत  मोठा अनुभव असून महिला क्षेत्रात त्यांचे मोलाचे स्थान आहे. या त्यांच्या अनुभवाचा लाभ घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे योग्य नियोजन करण्याच्या  सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील निवडक 150 गटांना विशेषत: प्राविण्य गटात घेऊन व्यवसाय व्यवस्थापनाचे घडे त्यांना देण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व खाद्यांनापासून सर्व प्रकारचे स्टॉल राहणार असून 13 तालुक्यातून सुमारे 10 हजार बचत गटाच्या महिला येणार आहे. त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जिल्हा परिषदेद्वारे वाहन व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला प्रॉडक्टला प्राधान्य या मेळाव्यात राहणार असून मोठी आर्थिक उलाढाल महिला जगतात होणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी सहकार्याच्या भावनेतून काम करावे,  असेही ते म्हणाले.

या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गरजे इतके बियाणे आणि कधी मिळतील याची खबरदारी घ्या – कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post

शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गरजे इतके बियाणे आणि कधी मिळतील याची खबरदारी घ्या – कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्या

फलटण नगरपरिषदेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर

July 6, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पावसाळ्यातील आजारांविषयी डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

July 6, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेशीमबाग स्मृती मंदिराला भेट

July 6, 2022

कारागृहाबाहेर वास्तव्य करणाऱ्या एकावर गुन्हा

July 6, 2022

अल्पवयीन मुलीस पळवले

July 6, 2022

खिंडवाडी येथे एकाला मारहाण पाच जणांवर गुन्हा

July 6, 2022

मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा

July 6, 2022

साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी

July 6, 2022

दारुच्या नशेत पडून एकाचा मृत्यू

July 6, 2022

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

July 6, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!