• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पंतप्रधानांचा काशी दौरा : शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले पंतप्रधान

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 30, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, वाराणसी, दि.३०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
स्वतःच्या वाराणसी मतदारसंघात आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी
प्रयागराज-वाराणसी 6 पदरी महामार्गाचे लोकार्पण केले. यानंतर सभेत शेतकरी
आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, MSP आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा
छळ करणारे आता कृषी कायद्यांबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही
त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे.

मी
वाराणसीच्या पवित्र भूमिवरून सांगू इच्छितो की, आता कट कारस्थान करुन
नाही, तर गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे काम केले जात आहे. भ्रम
पसरवणाऱ्यांचे सत्य देशासमोर येत आहे. आज ज्या शेतकऱ्यांना कृषी
कायद्यांबाबत शंका आहे, ते देखील भविष्यात याचा लाभ घेतील. जर जुन्या
यंत्रणेद्वारे व्यवहार योग्य समजला जात असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही.
नवीन कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वातंत्र्य
देण्यात आले आहे.

जे घडले नाही त्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे

मोदी
म्हणाले की, सरकारने एखादा कायदा तयार केला तर त्याला पाठिंबा व विरोध
दोन्ही केले जाते. पूर्वी सरकारचा निर्णय कोणालाही आवडायचा नाही, त्याला
विरोध व्हायचा. आता प्रचार केला जातो की, निर्णय योग्य आहे. पण पुढे चालून
काय होईल हे सांगता येणार नाही. जे होणारच नाही त्याबद्दल समाजात संभ्रम
निर्माण केला जात आहे. 24X7 त्यांचे हेच काम आहे. असे म्हणत मोदींनी
विरोधांवर टीका केली.

विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा छळ केला

मोदींनी
नवीन कायद्याच्या विरोधावर म्हटले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी दशकांपासून
शेतकऱ्यांचा छळ केला. आधी MSP च्या नावावर छळ केला. लहान आणि सीमांत
शेतकर्‍यांना फायदा होत नव्हता. कर्जमाफीच्या नावावर छळ केला गेला.

शेतकर्‍यांच्या
नावे मोठ्या योजना बनविल्या गेल्या, पण 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात
असे ते मानायचे. अनेक अनुदान देण्यात आले. पण त्यातही घोटाळे व्हायचे.
शेतकर्‍यांना उत्पादकता वाढविण्यास सांगितले. एखाद्याची उत्पादनक्षमता
दुसर्‍या एखाद्यासाठी सुनिश्चित केली गेली.

मोदींनी पीक खरेदीची माहिती दिली

यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीक खरेदीची आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की
2014च्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देशात 650 कोटींची डाळ खरेदी केली.
आमच्या पाच वर्षांच्या काळात 49 हजार कोटींच्या डाळी MSPवर खरेदी केल्या.
यामध्ये 75 पटीने वाढ आहे. आधीच्या सरकारने MSP वर 2 लाख कोटींचे धान्य
खरेदी केले, आम्ही MSP द्वारे 5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.
काँग्रेस सरकारने पाच वर्षांत MSP च्या आधारावर 1.5 लाख कोटींचा गहू खरेदी
केला, तर आम्ही 3 लाख कोटींचा गहू खरेदी केला. जर मंडी संपवायच्या असत्या
तर मग आम्ही त्यांना एवढे मजबूत का केले?


Tags: देशशेती विषयक
Previous Post

मुंबईत कोरोना लशीचा साठा ठेवण्याची जागा निश्चित

Next Post

देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करतात : अरविंद मेहता

Next Post

देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करतात : अरविंद मेहता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!