स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पंतप्रधानांचा काशी दौरा : शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले पंतप्रधान

Team Sthairya by Team Sthairya
November 30, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, वाराणसी, दि.३०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
स्वतःच्या वाराणसी मतदारसंघात आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी
प्रयागराज-वाराणसी 6 पदरी महामार्गाचे लोकार्पण केले. यानंतर सभेत शेतकरी
आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, MSP आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा
छळ करणारे आता कृषी कायद्यांबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही
त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

मी
वाराणसीच्या पवित्र भूमिवरून सांगू इच्छितो की, आता कट कारस्थान करुन
नाही, तर गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे काम केले जात आहे. भ्रम
पसरवणाऱ्यांचे सत्य देशासमोर येत आहे. आज ज्या शेतकऱ्यांना कृषी
कायद्यांबाबत शंका आहे, ते देखील भविष्यात याचा लाभ घेतील. जर जुन्या
यंत्रणेद्वारे व्यवहार योग्य समजला जात असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही.
नवीन कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वातंत्र्य
देण्यात आले आहे.

जे घडले नाही त्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे

मोदी
म्हणाले की, सरकारने एखादा कायदा तयार केला तर त्याला पाठिंबा व विरोध
दोन्ही केले जाते. पूर्वी सरकारचा निर्णय कोणालाही आवडायचा नाही, त्याला
विरोध व्हायचा. आता प्रचार केला जातो की, निर्णय योग्य आहे. पण पुढे चालून
काय होईल हे सांगता येणार नाही. जे होणारच नाही त्याबद्दल समाजात संभ्रम
निर्माण केला जात आहे. 24X7 त्यांचे हेच काम आहे. असे म्हणत मोदींनी
विरोधांवर टीका केली.

विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा छळ केला

मोदींनी
नवीन कायद्याच्या विरोधावर म्हटले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी दशकांपासून
शेतकऱ्यांचा छळ केला. आधी MSP च्या नावावर छळ केला. लहान आणि सीमांत
शेतकर्‍यांना फायदा होत नव्हता. कर्जमाफीच्या नावावर छळ केला गेला.

शेतकर्‍यांच्या
नावे मोठ्या योजना बनविल्या गेल्या, पण 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात
असे ते मानायचे. अनेक अनुदान देण्यात आले. पण त्यातही घोटाळे व्हायचे.
शेतकर्‍यांना उत्पादकता वाढविण्यास सांगितले. एखाद्याची उत्पादनक्षमता
दुसर्‍या एखाद्यासाठी सुनिश्चित केली गेली.

मोदींनी पीक खरेदीची माहिती दिली

यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीक खरेदीची आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की
2014च्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देशात 650 कोटींची डाळ खरेदी केली.
आमच्या पाच वर्षांच्या काळात 49 हजार कोटींच्या डाळी MSPवर खरेदी केल्या.
यामध्ये 75 पटीने वाढ आहे. आधीच्या सरकारने MSP वर 2 लाख कोटींचे धान्य
खरेदी केले, आम्ही MSP द्वारे 5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.
काँग्रेस सरकारने पाच वर्षांत MSP च्या आधारावर 1.5 लाख कोटींचा गहू खरेदी
केला, तर आम्ही 3 लाख कोटींचा गहू खरेदी केला. जर मंडी संपवायच्या असत्या
तर मग आम्ही त्यांना एवढे मजबूत का केले?

Related


Tags: देशशेती विषयक
Previous Post

मुंबईत कोरोना लशीचा साठा ठेवण्याची जागा निश्चित

Next Post

देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करतात : अरविंद मेहता

Next Post

देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करतात : अरविंद मेहता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“हर घर तिरंगा” या अभियानासाठी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे मोफत ध्वज देणार

August 11, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

August 11, 2022

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 11, 2022

देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

August 11, 2022

रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

August 11, 2022

शहीद हसेन – हुसेन यांच्या ताबुताला आटपाडीच्या नाथांनी दिला खांदा !

August 11, 2022

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

August 11, 2022

आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

August 11, 2022

मुधोजी महाविद्यालयात M.Com. व M.Sc चे वर्ग सुरू

August 11, 2022
कटफळ गावातून रॅली काढताना झेनिबियाचे विद्यार्थी

झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!