• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करतात : अरविंद मेहता

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 1, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण दि. ३० : राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत यांनी स्वदेशी बचाव व आजादी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून सुरु केलेले कार्य आजही अविरत सुरु आहे. आज देशाला स्वदेशीची गरज असून देशभर राजीववाद या नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करीत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.

आसू ता. फलटण येथे सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत यांची जयंती व पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साधे पद्धतीने साजरी करण्यात आली.यावेळी अरविंद मेहता बोलत होते. महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे, ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख श्रीरंग पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

राष्ट्रबंधू राजीव दिक्षीत यांनी सेटेलाईट टेलकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले होते, त्याच बरोबर ते उच्च विद्याविभूषित होते. भोपाळ वायू दुर्घटनेतील नरसंहारामुळे बहुराष्ट्रीय कंपन्याविरुध्द आजादी बचाव आंदोलन त्यांनी सुरु केले. भारत देशावर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १५० वर्षे राज्य केले. आज ५ हजाराच्यावर बहुराष्ट्रीय कंपन्या भारत देशात व्यापार करुन देशाची लुट करीत आहेत. भारतीय स्वातंत्र्याला पूर्वीपेक्षाही आज स्वदेशीची खरी गरज असल्याचे राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत नेहमी सांगत असल्याची आठवण अरविंद मेहता यांनी यावेळी करुन दिली.

राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांनी देशातील जनतेला दिलेले विचार खूप प्रेरणादायी असून आज देशभर राजीववाद या नावावर लाखो लोक एकत्र येवून स्वदेशी बचावचे काम करीत असल्याचे प्रकाश सकुंडे यांनी सांगितले.

स्वर्गीय राजीवजी दीक्षित हे सन १९९३ साली आसू ता. फलटण येथे स्वदेशी बचाव, देश बचाव जनजागृती करण्यासाठी आले असता आसू येथे राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले असल्याचे नाना जाधव यांनी निदर्शनास आणून देत त्याच वृक्षाच्या सावलीत आजचा कार्यक्रम होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

प्रारंभी राष्ट्रबंधू स्व. राजीवजी दीक्षित यांच्या प्रतिमेचे पूजन त्यानंतर राजीवजी दीक्षित यांनी लावलेल्या झाडाचे पूजन करण्यात आले. 

कार्यक्रमास प्रकाश सकुंडे, नाना जाधव, शंकर गायकवाड, प्रविण सकुंडे, अजय गोळे, आकाश सकुंडे, फाळके, रोहन गायकवाड, साहिल सकुंडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.


Tags: फलटण
Previous Post

पंतप्रधानांचा काशी दौरा : शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले पंतप्रधान

Next Post

कोयना धरणाच्या भिंतीतून नऊ फुटांच्या अजगराची सुटका

Next Post

कोयना धरणाच्या भिंतीतून नऊ फुटांच्या अजगराची सुटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!