स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा स्वनिधी महोत्सव उत्साहात संपन्न

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 25, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । ठाणे । कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यावर मोठा परिणाम झाला होता. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आशा अनेक लोकांचे संसार वाचले व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कल्याण डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सव प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील विशेष अतिथी होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगर परिषद प्रशासनचे उप आयुक्त रोहिदास दोरकुळकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी वैभव खानोलकर, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव, परिचय पत्राचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वांना सामावून घेणारे, सर्वांचे हित जोपासून विकासाचे स्वप्न साकारण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वनिधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. फेरीवाले यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी. या बरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी. पीक विमा योजने प्रमाणेच फेरीवाल्यांना सुद्धा बँकांनी कर्ज उपलब्ध करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्याना, सर्व घटकांना न्याय देणारे, त्यांचे हित जोपासणारे हे राज्य शासन आहे. वंचित घटकांना मदत करण्यात येईल. राज्य शासन लवकरच पुढील शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करणार आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्याचा मदत व्हावी, यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे. याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम ही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा.

प्रास्ताविकात आयुक्त डॉ. दांगडे स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

प्रवचने – भगवंताचे नाम सोडू नका

Next Post

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दीनिमित्त आयोजित “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण

Next Post

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दीनिमित्त आयोजित “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी

August 19, 2022

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 19, 2022

अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 19, 2022

गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

August 19, 2022

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 19, 2022

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

August 19, 2022

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

August 19, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन

August 19, 2022

प्रवचने – आपल्याला देवाची नड वाटते का ?

August 19, 2022

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

August 19, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!