• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

नुसता शो नको, तर ऍक्‍शन हवी; गृहराज्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 19, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, उंब्रज, दि.१९: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर
इंदोली (ता. कऱ्हाड) येथील इंदोली फाटा येथे काल शुक्रवारी सकाळी “ऑपरेशन
सेफ्टी ऑन हायवेज्‌’ या मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेच्या पहिल्याच
दिवशी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या
वेळी समाधानकारक काम न दिसल्याने त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फैलाव घेत
“मला नुसता शो नको आहे, तर ऍक्‍शन हवी’ अशा सक्त सूचना त्यांनी
अधिकाऱ्यांना केल्या.

 

महामार्गावर इंदोली येथे, तसेच राज्यभरातील येणाऱ्या मार्गावर कालपासून
“ऑपरेशन सेफ्टी व हायवेज्‌’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर
होणारे अपघात रोखण्यासाठी मोहिमेमुळे महामार्गावर नियमबाह्य वाहन
चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत महामार्ग
पोलिस, जिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ व स्थानिक पोलिसांनी एकत्रित येऊन
कारवाईला सुरुवात केली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, तसेच वाहतुकीचे नियम
मोडून बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शंभूराज देसाई यांनी इंदोली फाट्यावर धाव
घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली. मात्र, मोहिमेला अनुरूप काम होत नसल्याने
त्यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना फैलावर घेत “तुम्हाला नेमकी संकल्पना समजली
आहे का?’ अशी विचारणा केली. “कारवाईत हयगय नको’ अशी सूचना त्यांनी केली. 

गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, “”वाहतुकीला शिस्त
लागावी, यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक घेतली होती.
त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
त्याची सुरुवात पुणे-बंगळूर हायवेवर केली आहे. महामार्गावरील लेन सोडून
अवजड वाहनांनी डाव्या बाजूने वाहने चालवली पाहिजेत हा नियम आहे; परंतु
वाहनचालक उजव्या बाजूने वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. नियमभंग करून
चालणाऱ्या वाहनावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कोणालाही नाहक त्रास
देण्यासाठी ही मोहीम नाही, तर प्रवास करणाऱ्या लोकांचा जीव महत्त्वाचा
आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम असून, सकाळी आठ ते रात्री
आठ या 12 तासांत किती कारवाया झाल्या याचा अहवाल माझ्याकडे येईल.
वाहनधारकांनीही नियम मोडू नयेत.” 


Tags: सातारा
Previous Post

108 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 266 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायती लढवणार

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायती लढवणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!