• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 16, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.१६: बहीण भावाच्या नात्यातील स्नेह वाढवणारा सण म्हणजे भाऊबीज…या दिवशी
भावाचे औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्याची कामना सगळ्या बहिणी करतात. पण
आज भाऊबीजेच्या दिवशी शहिद जवान ऋषिकेश यांची बहिण कल्याणी हिच्यावर
ऋषिकेशच्या पार्थिवाचे औक्षण करण्याची वेळ आली. ऋषिकेश यांच्या पार्थिवाचे
तिने औक्षण करताच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. अत्यंत वेदनादायी असा
क्षण कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडितील ग्रामस्थांनी आज अनुभवला.

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे हे काश्मीरमध्ये
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. आज कोल्हापूर जिल्ह्यातील
बहिरेवाडी गावात शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी ऋषिकेश शहिद झाले. ही बातमी समजता आई-वडिल आणि बहिणीवर दुःखाचा
डोंगर कोसळला. संपूर्ण गावात शोककळा पसरली. चार दिवसांनी ऋषिकेशचे पार्थिव
गावात दाखल झाले.

ऋषिकेश यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक पहाटे पासून
उपस्थित होते. वीर जवान अमर रहे चर्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ऋषिकेश जोंधळे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना उपस्थितांनी
व्यक्त केल्या.

सकाळी साडे सातच्या सुमारास
बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मुळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या
घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला. अवघ्या वीस
वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रूंचा बांध फुटला.
त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. अंतिम यात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या
मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.

या
ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय
मंडलिक, अमरजीत राजा घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी
झाडून मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जय….चा जयघोष झाला. शहिद जवान
ऋषिकेश जोंधळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी खबरदारी घेतली होती.


Tags: राज्य
Previous Post

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना होणार

Next Post

सलग 2 निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याच्या तयारीत होते नितीश कुमार; अटल बिहारी यांच्यामुळे बनले मुख्यमंत्री

Next Post

सलग 2 निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याच्या तयारीत होते नितीश कुमार; अटल बिहारी यांच्यामुळे बनले मुख्यमंत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!