• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महाविकास आघाडीचा विजय म्हणजे वाचाळ बडबड करणार्‍यांना जबरदस्त चपराक, अजित पवारांचा भाजपला टोला

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 4, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.४: पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे
निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला
आहे. पुणे आणि नागपूर या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या जागांवर
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी या निकालाने विरोधकांना चपराक बसली असल्याचे म्हणत भाजपला
टोला लगावला आहे.

अजित पवार
या विजयावर बोलताना म्हणाले की, ‘नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
आणि देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांनी गेली कित्येक वर्षे जागा राखलेली होती.
आता तिथेही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबादेतही न भुतो
न भविष्य असा विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्यात पडला
आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा निवडून आली नाही, याचे दुःख
असल्याचेही पवार म्हणाले.

वाचाळ बडबड करणाऱ्यांना चपराक

अजित
पवार यांनी नाव न घेता भाजपमधील काही मोठ्या नेत्यांना टोला लगावला आहे.
बरेच लोक वाचाळ बडबड करत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे
त्या वाचाळविरांना जबरदस्त चपराक आहे. असे म्हणत अजित पवारांनी भाजपला
चांगलाच टोला लगावला आहे. तसेच आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय
हे या निकालांवरुन स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि आमची सर्वांचीच जबाबदारी वाढली

पुढे
बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा
आघाडीतील सर्व पक्षांच्या एकतेचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवर
विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे.’ तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना
विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार अजित पवारांनी मानले. पुढे पवार
म्हणाले की, ‘राज्यातील सुशिक्षित वर्ग, पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास
आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि आमची
सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. त्याचबरोबर एकत्रित येत निवडणूक लढवण्याचे
फळं काय आहे हे देखील पाहायला मिळाल्याचे पवार म्हणाले.


Tags: राज्य
Previous Post

देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य राहुल गांधी यांच्यात नाही – शरद पवार

Next Post

RBI ची MPC बैठक:रिझर्व्ह बँकने महागाई लक्षात घेत रेपो रेट 4% ठेवला, बँक दरामध्ये कोणताही बदल नाही

Next Post

RBI ची MPC बैठक:रिझर्व्ह बँकने महागाई लक्षात घेत रेपो रेट 4% ठेवला, बँक दरामध्ये कोणताही बदल नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!