स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, मुंबई, दि.१२ :  लोकनेते राजारामबापू पाटील यांची पिढी अतिशय अनुभव संपन्न असून बापूंचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे केले.

लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम आज विधानभवन येथे आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नरहरी झिरवाळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, राजारामबापू हे अतिशय स्वच्छ व चारित्र्यवान नेतृत्व होते. त्यांचा काळ पाहिला असता असे लक्षात येते की, ती  पिढी कर्तृत्ववान व  नशिबवान आहे दिग्गज मंडळी आजूबाजूला असल्यामुळे ते नशिबवान तर कार्य कर्तृत्वाने घडत गेल्यामुळे कर्तृत्ववान. बापू नुसते घडले नाही तर त्यांनी पिढी घडवली. लोकनेते, पदयात्री, असलेल्या राजारामबापू यांनी केलेल्या कार्यामध्ये मजूर वर्ग, शेतकरी, उद्योग सर्वसामान्य अशा सर्वांच्या विकासाचा समावेश आहे. त्यांचाच वारसा लाभलेले जयंतराव पाटील सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असेही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले.

राजारामबापूचे कार्य महत्त्वपूर्ण व प्रगतीपथावर – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजारामबापूंच्या स्मृतीस अभिवादन करुन सांगितले की, राजारामबापूचे कार्य हे महाराष्ट्राच्या कायमस्वरुपी लक्षात राहील असेच आहे. त्यांनी अतिशय कठीण काळामध्ये बदल घडविण्याचे कार्य केले. विकासास गती देण्याचे काम केले. आजही त्यांच्या वाळवा तालुक्यातील विविध सहकारी संस्था या उत्तमरितीने सुरु आहेत. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. विकासाच्या दृष्टीने केवळ तालुकाच नाहीतर राज्यस्तरावर देखील त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. तुलनात्मकदृष्ट्या त्यांना कमी आयुष्य लाभले तरी त्यांनी केलेले कार्य हे महत्त्वपूर्ण व प्रगतीपथावर नेणारे आहे.

सर्वांगिण विकासास मोठा हातभार – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

राजाराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या दिग्गज लोकनेत्यांनी सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग महाराष्ट्राला दाखविला त्यापैकी राजाराम बापू हे एक आहेत. त्यांना पदयात्री म्हणून संबोधणे म्हणजेच त्यांच्या कार्याची नाळ जनतेशी जोडली होती याचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी विविध विभागाचे मंत्री म्हणून कार्यभार उत्तम रितीने सांभाळून कर्तृत्व सिद्ध केले. ऊर्जामंत्री असताना १४ हजार गावांत वीज पोहोचविणे आणि एमआयडीसी उभारुन औद्योगिकीकरण करणे, साखर कारखाना, सुतगिरण्या सुरू करून राज्याच्या सर्वांगिण विकासास मोठा हातभार राजाराम बापू पाटील यांनी लावला आहे.

समृद्ध महाराष्ट्र उभारण्यात मोठा वाटा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात परिवर्तनाची लाट असताना त्याचे राज्यात नेतृत्व करण्याचे काम बापूंनी केले. समृद्ध जीवनाचे व्यक्तीमत्व म्हणजे बापू होत. स्वातंत्र्यानंतरसुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काँग्रेसने पाय रोवून उभे करण्याचे काम बापूंनी केले. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षात समृद्ध महाराष्ट्र उभा राहिला यात मोठा वाटा स्व. यशवंतराव चव्हाण यांचा दृष्टीकोन आणि स्व. राजाराम बापूंच्या नेतृत्व व कर्तृत्वाचा आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांनी स्व.राजारामबापूंच्या प्रतिमेस पुष्पअर्पण केले. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी लोकनेते राजारामबापू यांच्या कार्यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आल्या. तसेच नितिश भारती या कलावंताने वाळूच्या माध्यमातून स्व. बापूंच्या कार्याचा इतिहास विविध कलाकृतीने अतिशच मोहकपणे उपस्थितांच्या समोर सादर केले.

आपल्या प्रास्ताविकातून जयंत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच लोकनेते राजारामबापू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमांची थोडक्यात उजळणी केली. स्व. राजारामबापूंच्या पुण्याईवर मी उभा असून त्यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. या शब्दात आपले मनोगत व्यक्त कले.

यावेळी औरंगाबादचे माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर यांनी स्व. राजारामबापू म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना लक्षात ठेवणारा त्यांची आस्थेनी चौकशी करणारा नेता अशा शब्दात व आ. बबनराव पाचपुते यांनी स्व. राजारामबापू यांच्या आठवणी सांगून समयोचित भाषण केले.ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्व. राजारामबापू यांच्या विविध आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोशल डिस्टन्सींगचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

तालुक्यातील सर्व गावात वनीकरणाच्या बाबतीत बिहार पॅटर्न राबवा; फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांची मागणी

Next Post

Phaltan : ग्रामपंचायत निंबळक; जाहीर खुली निविदा नोटीस

Next Post
Phaltan : ग्रामपंचायत निंबळक; जाहीर खुली निविदा नोटीस

Phaltan : ग्रामपंचायत निंबळक; जाहीर खुली निविदा नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.