स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आत्मनिर्भर भारत पॅकेजची अंमलबजावणी – आतापर्यंतची प्रगती

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आत्मनिर्भर भारत पॅकेजची अंमलबजावणी – आतापर्यंतची प्रगती
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी कोविड-19 साथीच्या आजारामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे- जीडीपीच्या 10% समतुल्य विशेष आर्थिक आणि सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले होते. त्यांनी आत्मनिर्भर भारत किंवा स्वावलंबी भारत चळवळीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या – अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, दोलायमान जनसांख्यिकी आणि मागणी या पाच स्तंभांची रूपरेषा देखील दिली होती.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 13 मे 2020 ते 17 मे 2020 या काळात पत्रकार परिषदेत आत्मनिर्भर भारत पॅकेजचा तपशील सांगितला होता.

अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांनी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत असलेल्या आर्थिक पॅकेजशी संबंधित घोषणांची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. दररोज आर्थिक पॅकेजच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणे आणि देखरेखीवरून सरकारचे याबाबतचे गांभीर्य लक्षात येते.

अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरु असलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज योजनांच्या अंमलबजावणीची आतापर्यंतची प्रगती खालीलप्रमाणे आहेः

1) नाबार्डमार्फत 30,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आपत्कालीन कार्यकारी भांडवल निधी – 

28 ऑगस्ट 2020 रोजी 25,000 कोटी रुपये जारी करण्यात आले. उर्वरित 5000 कोटी रुपये विशेष तरलता सुविधेअंतर्गत (एसएलएफ) आरबीआयने लहान एनबीएफसी आणि एनबीएफसी-एमएफआयसाठी नाबार्डला दिले आहेत. नाबार्ड लवकरच कार्यान्वित मार्गदर्शक सूचनांना अंतिम रूप देत आहे.

त्याशिवाय, अनिर्देशित एनबीएफसी/एमएफआय यांना सावकाराकडून पत मिळण्यास मदत करण्यासाठी नाबार्डने दोन संस्था आणि बँकांच्या सहकार्याने संरचित वित्त आणि आंशिक हमी योजना देखील सुरु केली आहे. 

रेटिंग नसलेल्या अशा दोन संस्था आणि बँकांसह ही यंत्रणा कार्य करेल ज्यामुळे अशा लहान एमएफआयकडे पत पात्रतेसाठी 5-6 पट वाढ होईल. एकदा या योजनेसाठी सर्व राखीव 500 कोटी रुपये उपयोजित झाल्यावर त्या लहान एनबीएफसी / एमएफआयद्वारे 2500 ते रू. 3000 कोटी रुपयांच्या पत बाबत परिकल्पना केली आहे. दुर्गम भागातील लोकांपर्यंत विशेषत: महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हा खूप महत्वपूर्ण बदल ठरणार आहे.

2) एनबीएफसी, एचएफसी आणि एमएफआय यांना एमएसएमई आणि व्यक्तींना नवीन कर्ज देण्यासाठी 45,000 कोटी रुपयांची आंशिक पत हमी योजना – 

28 ऑगस्ट 2020 रोजी बँकांनी 25,055.5 कोटी रुपयांच्या पोर्टफोलियो खरेदिला मंजुरी दिली असून सध्या अतिरिक्त 4,367 कोटी रुपयांच्या मान्यता / वाटाघाटी सुरू आहेत.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

3) एनबीएफसी / एचएफसी / एमएफआयसाठी 30,000 कोटींच्या विशेष तरलता योजनेचीही चांगली प्रगती झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसबीव्हीएपीला एसपीव्ही स्थापण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही योजना 1 जुलै, 2020 रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरू करण्यात आली. त्याच दिवशी आरबीआयनेही एनबीएफसी आणि एचएफसीला या योजनेचे परिपत्रक जारी केले.

11 सप्टेंबर, 2020 रोजी, 10590 कोटी रुपयांच्या 37 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 783.5 कोटी रुपयांचे सहा अर्ज विचाराधीन आहेत. 

4) एमएसएमईसह व्यवसायांसाठी 3 लाख कोटी तारण मुक्त स्वयंचलित कर्ज – 

व्यवसायाला दिलासा देण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 रोजी थकीत कर्जाच्या रकमेवर सवलतीच्या दरात थकीत कर्जाच्या 20% अतिरिक्त कार्यशील भांडवली वित्त प्रदान केले जाईल. 25 कोटी रुपयांपर्यंतची थकीत आणि 100 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगांना देखील ही सुविधा उपलब्ध आहे. उद्योगांना स्वतःची कोणतीही हमी किंवा तारण सुविधा देण्याची गरज नाही. याची 100% हमी हि सरकारची असेल. 

20 मे 2020 रोजी मंत्रिमंडळाची मंजूरी घेतल्यानंतर वित्तीय सेवा विभागाने २३ मे 2020 रोजी या योजनेसाठी कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि 26 मे 2020 रोजी याची आपत्कालीन पत हमी योजना (ईसीएलजीएस) निधी म्हणून नोंदणी केली. 4 ऑगस्ट 2020 रोजी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करून यात व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जे समाविष्ट करणे, कर्जाची थकबाकी मर्यादा 50 कोटी रुपये आणि वार्षिक उलाढाल मर्यादा 250 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली.

10 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आणि खाजगी क्षेत्रातील 23 बँकांनी दिलेल्या वृत्तानुसार, 42,01,576 कर्जदारांना अतिरिक्त 1,63,226.49 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहेत. 10 सप्टेंबर 2020 रोजी 25,01,999 कर्जदारांना 1,18,138.64 कोटी रुपये वितरित केले आहेत.

5) प्राप्तीकर परतावा – 

1 एप्रिल 2020 ते 8 सप्टेंबर 2020 या कालावधीत 27.55 लाखाहून अधिक करदात्यांना 1,01,308 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. 25,83,507 प्रकरणांमध्ये 30,768 कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला असून 1,71,155 प्रकरणांमध्ये 70,540 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला आहे. सर्व थकीत प्रकरणातील 50 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला आहे. इतर परतावा प्रक्रिया जारी आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

गंभीर रूग्णाचे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यापासून बचाव करण्यासाठी कमी खर्चाचे स्वदेशी उपकरण विकसित

Next Post

‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार

Next Post
‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार

‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

January 17, 2021
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.