स्थैर्य, सांगली , दि .21: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.