स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 11, 2021
in सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि. ११ : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटेल. यातच भाजप खासदार उदयनराजे भोसले  या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाले असून, आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेदपत्रिका काढावी, या मागणीचा पुनरुच्चार उदयनराजे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

सरकार काय करतंय, तेही कळू द्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केल नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. अशामुळे मराठा मुले फस्ट्रेशनमध्ये येणार नाहीत का, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.

नेत्यांना भेटून काहीही उपयोग झाला नाही

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी दिल्या. मराठा आरक्षण हाच मुख्य मुद्दा या भेटींमागील होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याची खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या व्यक्ती न्यायालयात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकांशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो पण त्याचा उपयोग झाला नाही असे वाटते, अशी नाराजी उदयनराजे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. तसेच विधिमंडळातही भाजपने सरकारला घेरले. देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत, अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाशी काही घेणे-देणे नाही, असा दावा केला.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याबाबत अजित पवार म्हणाले

Next Post

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा

Next Post

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.