सर्वसामान्यांना दिलासा; केंद्र सरकारकडून १७ शहरांमध्ये ४ हजार टन स्वस्त कांद्याची विक्री

वाढत्या कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून १७ शहरांमध्ये ३५ रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०८ सप्टेंबर : देशातील कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून तब्बल ४ हजार टन कांदा देशातील १७ महत्त्वाच्या शहरांमध्ये ३५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला आहे. गेल्या १० दिवसांत या कांद्याची विक्री करण्यात आली असून यामुळे वाढत्या दराला काही प्रमाणात लगाम बसण्यास मदत झाली आहे.

‘कांदा एक्सप्रेस’द्वारे पुरवठा आणि महासंघाचा पुढाकार

केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कांदा एक्सप्रेस’ या विशेष रेल्वे मालगाडीद्वारे आणि ट्रक्सच्या माध्यमातून मुख्य बाजारपेठांमध्ये कांदा पोहोचवला जात आहे. दिल्ली आणि चेन्नई येथे कांद्याची खेप पोहोचली असून आता गुवाहाटीसाठी तिसरी खेप रवाना केली जात आहे. एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेड (NAFED) या संस्थांच्या माध्यमातून ही विक्री सुरळीत पार पाडली जात आहे.

अजून १.२१ लाख टन साठा शिल्लक

केंद्र सरकारकडे २०२६ या वर्षासाठी एकूण १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा उपलब्ध आहे. मोबाईल व्हॅन, सहकारी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या दुकानांद्वारे ग्राहकांना हा स्वस्त कांदा दिला जात आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून नवीन खरापाचा कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!