स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गोखळी – मेखळी पुल सुरु करावाः पै. बजरंग गावडे यांची मागणी

Team Sthairya by Team Sthairya
May 20, 2020
in Uncategorized

स्थैर्य, गोखळी: फलटण पूर्व भागातील शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी यांची बारामती तालुक्यातील येणे जाणे सुरू होऊन त्यांची गैरसोय दुर करावी अशी मागणी भाजपचे नेते पै. बजरंग गावडे यांनी प्रांताधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड 19 रोखण्यासाठी शासनाने सुमारे दोन महिने अधिक लावलेल्या लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय प्रामुख्याने पान टपरी, वडापाव व अनेक खाद्यपदार्थ, रिक्षा बंद असल्याने त्यावर चरितार्थ चालवणारे त्याचप्रमाणे लॉज, हॉटेल रेस्टॉरंट या व्यवसायातील वेटर, आचारी, सफाई कामगार कापड व तत्सम दुकानातील कामगार यांची रोजीरोटी बंद झालेली आहे. ग्रामीण भागात शेतावर मोलमजुर करणारे स्त्री, पुरुष, शेतमजूर, शेतमाल शेतातून काढून वाहून आणणारे त्याचे छाटणी करुन पॅकींग करणारे ते बाजार पेठेपर्यंत वाहून नेणारे छोटे वाहतुकदार वगैरे कष्ट करुन आपली व कुटूंबाची रोजीरोटी चालविणारे सर्व प्रकारच्या मजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था दानशुर व्यक्तीने केलेल्या मदतीने आत्तापर्यंत प्रसंगी अर्धपोटी राहून हे कुटुंब जगले आहेत यापुढे हे कितपत सुरु राहतील  याविषयी शाश्वती नसल्याने शासनाने या लोकांना रेशनकार्डवर मिळणारे धान्य, डाळी, तेल साखर लॉकडाऊन उठून सर्व व्यवहार सुरळीत सुरु होईपर्यंत मोफत द्यावे. तसेच वर खर्चासाठी प्रत्येक कुटूंबाला दरमहा एक हजार रुपये द्यावेत.

फलटण तालुक्याच्या पुर्व भागामधील शेतीमाल हा प्रामुख्याने बारामती मार्केटमध्ये जात असतो. तसेच या पुर्व भागामधील 36 गावातील एक हजार कामगार बारामती एम.आय.डी.सी.मध्ये कामाला जात आहेत. त्यांची गैरसोय रोखण्यासाठी गोखळी मेखळी पुल सुरु करावा. तालुक्यातील कारखान्याने शेतकर्‍यांची एफ. आर. पी. प्रमाणे तीन महिन्याची बिले दिली नाहीत . तरी त्या कारखान्यांने ऊस बिले दयावीत नाहीतर शासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा . महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रामपंचायतीला शेतकर्‍यांची संकलित कर, पाणीपट्टी, लाईट बील माफ करुन त्यांनी हे अनुदान स्वरुपात ग्रामपंचायतला दयावे.अशी मागणीही पै. बजरंग गावडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उदय मांढरे व रवी फडतरे यांची उपस्थिती होती.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

Tags: फलटण
ADVERTISEMENT
Previous Post

कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

Next Post

नवीन नियमावली नुसार सातारा जिल्हा रेड झोनच्या बाहेर; जिल्ह्यातील दुकाने लवकरच सुरु होतील : श्रीमंत रामराजे

Next Post

नवीन नियमावली नुसार सातारा जिल्हा रेड झोनच्या बाहेर; जिल्ह्यातील दुकाने लवकरच सुरु होतील : श्रीमंत रामराजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,027 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

April 17, 2021

अत्याचारी इंग्रजांना चाप लावणारे चाफेकर बंधू

April 17, 2021

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

April 17, 2021

रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

April 17, 2021

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

April 17, 2021

फलटण तालुक्यातील १६९ तर सातारा जिल्ह्यातील १५४३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३८ बाधितांचा मृत्यु

April 17, 2021

जिल्हाधिकारी महोदय, फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सहभागी करून घ्या; नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांची मागणी

April 17, 2021

सजाई गार्डन येथे उभारणार १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर; फलटणकरांच्या मदतीला धावून आले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे

April 17, 2021

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 17, 2021

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

April 17, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.