• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मंत्र्यांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी; अक्षयमहाराजांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 21, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, हिवडी (जि. सातारा), दि.२१ : अतिशय निष्ठेने परंपरा व नियम सांभाळणाऱ्या वारकऱ्यांना आदराने पंढरपूरात येऊ द्यावे, अन्यथा जसे वारकऱ्यांना घरी थांबण्यासाठी सांगत आहात, तसंच मंत्री महोदयांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी, अशी स्पष्ट मागणी वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली.

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती अद्याप कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, कार्तिक एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्षयमहाराज बोलत होते.

अक्षयमहाराज म्हणाले, वारकरी संप्रदाय कायमच सरकारी यंत्रणेला सहकार्य करत आला आहे. मात्र, सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीये. शासनाने कार्तिक एकादशीसाठी प्रत्येक मठात किमान ३० ते ५० वारकऱ्यांना सर्व कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत परवानगी द्यावी. सध्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या बाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकांना शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात, तेव्हा शासन या बैठकांवर अंकुश कसा ठेवत नाही? त्यांना नियम का लागू होत नाहीत. वारी व आध्यात्मिक काही आले की लगेच नियम लागू होतात. असली दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये. वारकरी संप्रदाय कायम सहकार्य करत आला आहे अन पुढेही करेल.

संत गाडगेबाबा कधीच मंत्रालयाची पायरी चढले नव्हते. मंत्री महोदय त्यांच्या भेटीस मंत्रालयाबाहेर येऊन थांबत असायचे. एकेकाळी इतका आदर साधू संतांविषयी सरकार बाळगत होते. आता मात्र सर्वच राजकीय पक्ष किंवा मायबाप सरकार प्रत्येक अध्यात्मिक गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. आज सरसकट मॉल व बाजार सुरु आहेत. तिथे कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता हजारो लोक वावरतात, तेव्हा शासन तिथे निर्बंध लावत नाही. शासनाची अशीच भूमिका कायम राहिली तर वारकरी संप्रदाय येत्या काळात आपली नाराजी दाखवून देईल यात शंका नाही. पोलिसांबाबत अत्यंत आदर बाळगत सांगू इच्छितो की, वारी बंदोबस्तासाठी १८०० पोलीस तैनात केले आहेत. त्याऐवजी जर किमान १५०० वारकरी येऊ दिले तर अडचण काय आहे? अन् वारकऱ्यांना घरी थांबवले जात असेल तर मंत्र्यांनी सुध्दा घरीच थांबावे व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विठूरायाची शासकीय पूजा करावी, असेही अक्षयमहाराजांनी शेवटी स्पष्ट केले.


Tags: सातारा
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

पुसेगाव-वडूज रस्त्याची बिकट अवस्था; खड्ड्यांतून मार्ग काढताना करावी लागतीय कसरत

Next Post

पुसेगाव-वडूज रस्त्याची बिकट अवस्था; खड्ड्यांतून मार्ग काढताना करावी लागतीय कसरत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!