स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय समिती स्थापन करा : विक्रम ढोणे

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय समिती स्थापन करा : विक्रम ढोणे
ADVERTISEMENT


 

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनापु्र्वी अध्यासन केंद्रासाठी 18 कोटींचा निधी मंजूर करावा  

स्थैर्य, सोलापूर, दि. २० : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय निधीची तरतूद करण्याची भुमिका राज्य शासनाने घेतली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आता हे स्मारक साकारण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या धर्तीवर शासकीय समिती स्थापन करावी, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे स्मारक हे जाणीवपुर्वक लोकवर्गणीतून करण्याचा घाट घातला होता. यापार्श्वभुमीवर अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीदिवशी (13 ऑगस्ट) धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री, तसेच सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अहिल्यादेवी स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. कुलगुरू मृणालिनी फडणवीस या अहिल्यादेवींना एका जातीत बंदीस्त करत असून त्या मन मानेल तसे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त निर्णयांची चौकशी करण्याची मागणीही ढोणे यांनी केली होती. 

यासंदर्भाने बुधवारी मुंबईत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत स्मारकासाठी भरीव निधी देण्याचे जाहीर करण्यात आले, तसेच ऑक्टोंबर महिन्यात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे भुमीपूजन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णय़ाचे स्वागत करून ढोणे यांनी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

राज्य शासन भरीव निधी देणार असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे मात्र नेमका निधी स्पष्ट केलेला नाही. अहिल्यादेवी स्मारक आणि अहिल्यादेवी अध्यासन या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. स्मारकासाठी विद्यापीठाने सुमारे अडीच कोटी मागितले आहेत, असे आम्हाला समजले आहे. पण हा निधी पुरेसा आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. कुलगुरू फडणवीस यांनी स्मारकासंबंधीची प्रक्रिया घाईगडबडीत केलेली आहे. त्यामुळे स्मारकाचा आराख़डा आणि तरतुदीचा विचार नव्याने करणे आवश्यक आहे. गरजेनुसार वाढीव तरतूद करावी. तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी सुमारे 18 कोटींचा प्रस्ताव आहे. त्याला मंजूरी मिळावी. सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक आणि भौगोलिक विकासाच्या अनेक बाबी तातडीने होणे आवश्यक आहेत. अहिल्यादेवींच्या नावाला साजेसे स्मारक करण्याबरोबरच विद्यापीठातील शिक्षणही त्या दर्जाचे झाले पाहिजे. विद्यापीठात सर्व विद्याशाखांचे विभाग सुरू व्हावेत.मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनाला येण्यापुर्वी अध्यासानाचा 18 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

यापुर्वी कुलगुरू फडणवीस यांनी वादग्रस्त व्यक्तींना घेवून स्मारक समिती बनवली आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवींचे स्मारक साकारण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात पुतळा उभा करताना अशी समिती करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्णय व्हावा. त्यामुळे अल्पावधीत स्मारकाचे काम मार्गी लागेल. हे स्मारक करीत असताना त्यात राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा करू नये. या समितीत मंत्री, शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, इतिहासाचे अभ्यासक, वास्तूरचनाकार असावेत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

कुलगुरूंच्या हेतूविषयी शंका

राज्य शासनाने कालच्या एका बैठकीत स्मारकाचा विषय मार्गी लावला. तसेच भुमीपूजनाची संभाव्य तारीखही जाहीर केली. यापार्श्वभुमीवर कुलगुरू फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी यापुर्वी स्मारकाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला होता का, त्याचा पाठपुरावा केला का, हे जनतेला समजणे आवश्यक आहे. लॉकडाऊनची पॅनिक परिस्थिती असताना फडणवीस लोकवर्गणीसाठी खाते उघडण्याची घाई करताना दिसल्या. समिती स्थापन करताना त्यांनी सुरवातीला सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा अदखलपात्र समजले. नंतरच्या टप्प्यात त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेतले. फडणवीस या राज्य शासनाला बाजूला ठेवून स्मारकाचे काम कां करू इच्छित होत्या, हेही समोर आले पाहिजे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

फलटणवरून मुंबई, पुणे, बारामती, सातारा, सांगली, सोलापूर व लोणंद कडे धावणार ‘लालपरी’

Next Post

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Next Post
शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

January 22, 2021
गणपतराव लोहार यांचे निधन

गणपतराव लोहार यांचे निधन

January 22, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

गर्दी करून मारहाण केल्याप्ररकणी गुन्हा दाखल 

January 22, 2021
बलात्काराच्या खोट्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाखाच्या खंडणीची मागणी; पाचगणी पोलीस ठाण्यात एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर गुन्हा दाखल 

विनयभंग करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

January 22, 2021
कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

January 22, 2021
माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

January 22, 2021
अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.