स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महाबळेश्वर आगारात आठ दिवसांपासून डिझेल टंचाई; एसटीचे वेळापत्रक बिघडले

Team Sthairya by Team Sthairya
December 19, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, भिलार, दि.१९: सातारा विभागात उत्पन्नात व
भारमानात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर आगारात गेल्या आठ दिवसांपासून
डिझेलचा तुटवडा असल्याने प्रवासी, कामगारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा
लागतो आहे. इतर आगारांतही पुरेसे डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे आगाराचे
वेळापत्रक पुरते बिघडले आहे. 

महाबळेश्वर आगारातील डिझेल गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे संपलेले आहे.
त्यामुळे आगाराला डिझेलसाठी इतर आगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. डिझेल
नसल्याने इतर आगारांत इंधन भरण्यासाठी गाडी जात असल्यामुळे वेळापत्रक
विस्कळित होत आहे. मुंबईला जाताना तीन ते चार आगारांत बस इंधन भरण्यासाठी
न्यावी लागते. यामुळे अंदाजे तासभर गाडी उशिरा धावते. याचा फटका प्रवाशांना
बसतो आहे. वास्तविक महाबळेश्वर आगार उत्पन्न व भारमानात सातारा विभागात
आघाडीवर असताना आगाराला इंधन वेळेवर का उपलब्ध होत नाही? याबाबत वरिष्ठ
कार्यालयाने दखल घेणे आवश्‍यक आहे. 

महाबळेश्वर हे राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची
नेहमी वर्दळ असते. आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्याही चांगल्या उत्पन्न
आणतात, असे असतानादेखील आगारात इंधन नसल्याने आगाराच्या वेळापत्रकावर याचा
परिणाम झाला असून, डिझेल नसल्याने गाड्या उशिरा धावत आहेत. अगोदरच
महाबळेश्वर तालुका दुर्गम व डोंगराळ असून, गाड्या उशिरा धावत असल्यामुळे
सर्वसामान्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाबळेश्वर
आगारातील ग्रामीण मुक्कामी गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन
करावा लागतो आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर आगाराचा इंधन पुरवठा
तातडीने पूर्ववत करावा, तसेच ग्रामीण मुक्काम तातडीने सुरू करावेत, अशी
मागणी तालुक्‍यातील नागरिक व प्रवासी करत आहेत. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

इंधनाचा प्रश्न हा सर्व महाराष्ट्रात निर्माण झाला असून, त्याचा फटका
महाबळेश्‍वर आगारालाही बसला आहे; परंतु असे असले तरी आम्ही गाड्या वेळेवर
सोडत असून, या समस्येची झळ प्रवाशांना बसू नये, यासाठी आम्ही इतर
ठिकाणांहून इंधन उपलब्ध केले आहे. वरिष्ठ पातळीवरून इंधनाचा प्रश्न
मिटल्यावर वेळापत्रक सुरळीत होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


-नामदेव पतंगे, आगारप्रमुख, महाबळेश्‍वर 

Related


Tags: सातारा
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपशी आघाडी नकाे, राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!