स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राजे मंडळींकडून कोळकीकरांची फसवणूक : खा.रणजितदादा

Team Sthairya by Team Sthairya
January 11, 2021
in फलटण तालुका

स्थैर्य, कोळकी दि.11 : गेली अनेक वर्षे कोळकीवर राजे गटाची सत्ता आहे. पण या ठिकाणी अद्याप पिण्याच्या पाण्याचा मुलभूत प्रश्‍न त्यांना सोडवता आलेला नाही. राजे मंडळींनी कोळकीकरांची आजवर मोठी फसवणूक करण्याचे काम केले आहे, अशी टिका माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारादरम्यान केली.

कोळकी (ता.फलटण) ग्रामपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे प्रभाग क्रमांक ३ मधून धर्मराज देशपांडे, सौ. प्रियांका हिंगसे, सौ. कोमल जाधव व प्रभाग क्रमांक ४ मधून स्वप्नाली पंडित व गोरख जाधव यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मालोजीनगर येथील हनुमान मंदीरात श्रीफळ वाढवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, स्वागत काशिद, बाळासाहेब काशिद यांची उपस्थिती होती.

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, आत्ताच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत कोळकीच्या मतदानाच्या आकडेवारीवरुन हे सिद्ध झाले आहे की, कोळकीतली जनता बोलत नाहीत पण करुन दाखवते. कोळकी ग्रामस्थांच्यात सत्ताधार्‍यांप्रती प्रचंड असंतोष आहे. राजे गटाची अनेक वर्षे सत्ता असतानाही या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर आहे. कोळकीची दशा ‘अनियोजित शहर’ अशी झालेली आहे. कुठलेही गाव असले की त्या गावाला स्वतंत्र स्मशानभूमी ही असतेच. मात्र स्मशानभूमीसाठी आंदोलन करावं लागणारं कोळकी हे आशिया खंडातील पहिलंच गाव असेल, अशी उपरोधीक टिका ही यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्ताधार्‍यांवर केली.

निवडणूका या वारंवार होत असतात. परंतू लोकांनी विकासाला महत्त्व दिले पाहिजे. जो पर्यंत या ठिकाणचा स्थानिक पेटून उठणार नाहीत तो पर्यंत बदल घडणार नाही. ही निवडणूक तुमच्या विकासासाठी आहे हे लक्षात घेवून ग्रामपंचायतीच्या सत्तेत बदल घडवून आणावा. सत्ता भारतीय जनता पार्टीने पुस्कृत केलेल्या पॅनेलच्या हाती द्या; विकासाच्या कामात आम्ही कुणीही कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह कोळकी ग्रामस्थ उपस्थित होते.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Next Post

विकासाची गंगा अविरत ठेवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत उमेदवारांना विजयी करा: आमदार दीपक चव्हाण

Next Post

विकासाची गंगा अविरत ठेवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत उमेदवारांना विजयी करा: आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.