स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संततधार पावसाने ढेबेवाडी विभागात पिकांमध्ये पाणी साचून पिकांना धोका

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
संततधार पावसाने ढेबेवाडी विभागात  पिकांमध्ये पाणी साचून पिकांना धोका
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


 

स्थैर्य, पाटण, दि. 20 : उघडीप न देता सलग कोसळणार्‍या संततधार पावसाने ढेबेवाडी विभागात चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांमध्ये पाणी साचून पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून पिके कुजू लागली आहेत तर चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या पिकांच्या दाणे भरणीसाठी पावसाच्या उघडिपीची बळीराजाला प्रतीक्षा आहे. लवकरच पावसाने उघडीप दिली नाही तर पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांंची चिंता वाढणार आहे.

जून, जुलैमध्ये तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसाचा अपवाद वगळता विश्रांती घेतलेला पावसाने ऑगस्टच्या प्रारंभीपासून चांगलाच जोर पकडला आहे. मुसळधारेसह बरसणारा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त काही प्रमाणात लाभदायक ठरला आहे. मात्र  पावसाने उघडीप दिली नसल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. चवळी, दारकू, वाटाणा, मूग अशी आंतरपिके कुजू लागली आहेत. शेतकर्‍यांना नुकसानीचा फटकाही बसला आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे अति पावसामुळे नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

 

चालू वर्षी उन्हाळ्यात वळिवाने आणि जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने जमिनीच्या मशागती उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांनी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात धुमधडाक्यात खरीप पेरण्या सुरू करून उरकल्या.    कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे ढेबेवाडी विभागात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर गावात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांनी एप्रिल, मे महिन्यात शेतीच्या मशागतीवर लक्ष दिले होते. जूनमध्ये पेरण्या उरकल्यानंतर आठ-पंधरा दिवसात उगवणही चांगली झाली तर पावसानेही सलग वीस-पंचवीस दिवस उघडीप दिल्याने भांगलण, कोळपणी व अन्य आंतरमशागती आरामात करून घेता आल्या. त्याचा तणनाश होण्यास चांगला लाभ झाला.  8 जुलैनंतर थांबून थांबून पावसाच्या सरी येत राहिल्याने पीक वाढीला त्या उपयुक्त ठरल्याने पिकांची दमदार वाढ झाली होती.

 

पावसाच्या आगमनाची अपेक्षा असतानाच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाचे आगमन झाले तर काही दिवस मुसळधार पावसाने  सुरुवात केली. प्रारंभी आवश्यक असणार्‍या पावसाचा  खरिपाला लाभ झाला. मात्र सलग संततधार पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचलेले असून आंतरपिके कुजू लागली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीद , भुईमूगचे पीक पाण्यात बुडून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक परिस्थिती चांगली असताना सततच्या पावसाने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन सुद्धा अतिपावसाचा अनिष्ट परिणाम होऊन नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसर्‍या बाजूला पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसामुळे नुकसान झालाल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकर्‍याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: कराड
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना नियंत्रणासाठी शासनास लायन्स क्लबचे खूप मोठे सहकार्य : डॉ. शिवाजीराव जगताप

Next Post

Phaltan : त्वरित पाहिजेत

Next Post

Phaltan : त्वरित पाहिजेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

January 16, 2021

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

January 16, 2021

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

January 16, 2021

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

January 16, 2021

राजेंद्र फडतरे यांचे निधन

January 16, 2021

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.