औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील


स्थैर्य, मुंबई, दि. १७: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचा आढावा मंत्री श्री.पाटील यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते . या योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने जमिनीखालून जी पाईपलाईन गेली आहे तिचा नकाशा कळण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात यावी असे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले.

वाढीव न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा – 3 चा आढावा

रायगड जिल्ह्यातील वाढीव न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा – 3 या योजनेच्या कामाचा आढावाही पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,एमएमआरडीए व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अस्तित्वात येत आहे.या योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देश यावेळी मंत्रिमहोदयांनी दिले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह औरंगाबाद व पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!