स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सातारा शहरातील ७० ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण; वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स सफाई मोहिमेवर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
May 22, 2022
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील 85 पैकी 70 यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे घराचे नुकसान होणार नाही या पद्धतीने सफाई मोहिमेमध्ये त्या पद्धतीने काम केले जात आहे.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व ओढे-नाले स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर शहरांमध्ये काही ठिकाणी नाले गटारे तुंबले होते. झेंडा माळनाका राजलक्ष्मी थेटर परिसर येथे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तातडीने तेथे सेवा रस्त्यांना उतार देऊन पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. सातारा शहरातील एकूण 85 पैकी 70 ओढयांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी तीन जेसीबी आणि दहा कामगारांची तुकडी सफाई कामासाठी आळीपाळीने वापरली जात आहे. ओढ्यातील वनस्पती बाजूला करणे, नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे, तसेच त्यातील घाण जेसीबीने बाजूला करणे व उरलेला गाळ आणि इतर राडारोडा सोनगाव कचरा डेपोला स्थलांतरीत करणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

मुसळधार पावसामुळे शहराच्या डोंगरी भागातील माचीपेठ, केसरकर पेठ, सदर बाजार, लक्ष्मीटेकडी तसेच बोगदा परिसरातील डोंगराळ भागांमध्ये सफाई मोहिमेला गती देण्यात आली आहे. येथील कचरा तातडीने हटविण्यात येत आहे. मालशे पुलाची अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही अतिक्रमण न हटवल्याने डोंगर उतारावरून ओढयात येणारे पाणी परिसरातील घरांमध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Related


Previous Post

प्रवचने – गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी

Next Post

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण

Next Post

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण

ताज्या बातम्या

फलटण नगरपरिषदेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर

July 6, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पावसाळ्यातील आजारांविषयी डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

July 6, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेशीमबाग स्मृती मंदिराला भेट

July 6, 2022

कारागृहाबाहेर वास्तव्य करणाऱ्या एकावर गुन्हा

July 6, 2022

अल्पवयीन मुलीस पळवले

July 6, 2022

खिंडवाडी येथे एकाला मारहाण पाच जणांवर गुन्हा

July 6, 2022

मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा

July 6, 2022

साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी

July 6, 2022

दारुच्या नशेत पडून एकाचा मृत्यू

July 6, 2022

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

July 6, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!