
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । मुंबई । कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षामुळे कित्येक पिढ्यांच्या रखरखीत जीवनात ज्ञानाची सुखकर सावली, समृद्धी आली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आणि वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या कर्मवीर अण्णांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
