स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

केंद्रीय पथकाकडून भंडारा जिल्ह्यातील पीकहानीची पाहणी

Team Sthairya by Team Sthairya
December 25, 2020
in Uncategorized
????????????????????????????????????

????????????????????????????????????


स्थैर्य, भंडारा दि. २४ :  दिनांक 28 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे व घराचे नुकसान झाले. पीकहानीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. संचालक कृषि मंत्रालय आर.पी.सिंग व महेंद्र साहारे यांच्या नेतृत्वातील पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा पिंडकेपार व पवनी तालुक्यातील खाकसी या गावाला भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सहाय्यक संचालक कृषी रविंद्र भोसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसिलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे व उपविभागीय कृषि अधिकारी मिलींद लाड यावेळी उपस्थित होते.

पाहणी दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. या नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा येथे भेट देऊन बाजार समितीत आलेल्या धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांच्याकडून यावर्षी आलेल्या धान्याची प्रतवारी पथकाने जाणून घेतली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुटलेल्या धानाची टक्केवारी 30 टक्क्यांपर्यंत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अतिपावसामुळे मुगाचे उत्पन्नसुद्धा हलक्या प्रतीचे झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. कृषि उत्पन्न बाजार समितीत आलेले धान व मुगाची पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली.

भंडारा तालुक्यातील पिंडकेपार गावाला पथकाने भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. यानंतर शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी राकेश विठ्ठलराव वंजारी, लक्ष्मण निंबार्ते व वसंत सार्वे (बेला), या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पन्न 60 ते 70 टक्यांनी घटल्याचे शेतकऱ्यांनी पथकास सांगितले. सध्या चणा आणि गहू हे रब्बीचे पिक शेतात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यात केंद्रीय पथकाने पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट दिली. या भेटीत पथकाने नागरीकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला-कोरंभी रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त केला असून या मार्गाने आता दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.

दि. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर तालुक्यातील 144 गावे प्रभावीत झाली होती. या पुरात 5 हजार 398 घरांचे नुकसान झाले होते. त्याच प्रमाणे 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील 19 हजार 793 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. या सोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स व्यवसाय, विद्युत, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

107 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Next Post

शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Next Post

शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार

April 19, 2021

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

April 19, 2021

फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह

April 19, 2021

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णाचे पलायन; गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

April 19, 2021

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.